शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन पाच मुलींचे विवाह टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:40 IST

अनिल गायकवाड कुसळंब : पाटोदा शहराजवळ असलेल्या भटक्या-विमुक्तांच्या वसाहतीत सर्वसामान्य गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींचे होणारे बालवयातील विवाह हळद लागण्यापूर्वीच ...

अनिल गायकवाड

कुसळंब : पाटोदा शहराजवळ असलेल्या भटक्या-विमुक्तांच्या वसाहतीत सर्वसामान्य गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींचे होणारे बालवयातील विवाह हळद लागण्यापूर्वीच पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आले.

१६ फेब्रुवारीला मंगळवारी दुपारी १३ ते १५ वयोगटांतील पाच अल्पवयीन मुलींचे बालविवाह होणार होते. ही बेकायदेशीर बाब पोलिसांना गुप्तरित्या समजली. १५ फेब्रुवारीला हळदीचा कार्यक्रम हाेता, त्याची तयारी सुरू असतानाच पाटोदा ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले. यावेळी संबंधित मुलींच्या पालकांना पोलिसांनी कायद्यासंदर्भात विविध माहिती समजावून सांगितली. अल्पवयात विवाह केल्यानंतरचे दुष्परिणाम सांगितले. कायद्यानुसार मुलीच्या वयाची १८ वर्षे लागतात याचीही माहिती दिली. पोलीस महिला दक्षता समितीच्या वतीने सुरेखा खेडकर यांनी या कुटुंबीयांचे समुपदेशन केले.

यावेळी पाटोदा ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. बळिराम कातकडे, पो. कॉ. बाळू सानप, पो. कॉ. खेडकर आदी उपस्थित होते.

हळद लागणार एवढ्यात पोलीस दारात

१६ फेब्रुवारीला या विवाहाचा मुहूर्त काढला होता. तत्पूर्वी सोमवारी पंधरा तारखेला हळदीचा कार्यक्रम नियोजित होता; परंतु ही माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना समजली आणि खात्री केल्यानंतर पोलीस या वसाहतीत दत्त म्हणून पोहोचले. हळद लागणार तेवढ्यात पोलिसांची गाडी दारात आली आणि अल्पवयीन मुलींचे होणारे तब्बल पाच बेकायदेशीर विवाह रोखले गेले.

सर्वांच्या दक्षतेमुळे यश

‘बालविवाह कायदानुसार व शारीरिकदृष्ट्या घातकच' आहे. परंतु अज्ञानातून केवळ १३ ते १५ वयोगटांतील या पाच मुलींचे होणारे विवाह ही अत्यंत दुर्दैवी बाब होती; परंतु ही घटना पोलिसांना समजली आणि तत्काळ तेथे महिला दक्षता समितीच्या सदस्यांसह व पोलिसांनी त्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले आणि ते होणारे पाच बालविवाह रोखण्यात यश आले.

- महेश आंधळे,

सहाय्यक पोलीस निरीक्षक,

पोलीस ठाणे, पाटोदा.