शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

लाडेगाव येथील अतिक्रमित गायरान जमिनीवरील पिकावर फिरला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST

दीपक नाईकवाडे केज : तालुक्यातील लाडेगाव येथील अतिक्रमित गायरान जमिनीवरील हरभरा, ज्वारी व इतर रब्बीच्या उभ्या पिकांवर नांगर फिरवून ...

दीपक नाईकवाडे

केज : तालुक्यातील लाडेगाव येथील अतिक्रमित गायरान जमिनीवरील हरभरा, ज्वारी व इतर रब्बीच्या उभ्या पिकांवर नांगर फिरवून उभी पिके नष्ट करत अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही मंगळवारी महसूल प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात केली.

केज तालुक्यातील लाडेगाव येथील सर्व्हे नंबर १४३ या सरकारी गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून मागासवर्गीय समाजातील २२ भूमिहीन अतिक्रमण करून जमीन कसत होते. त्यांनी या सरकारी गायरान जमिनीवर खरिपाची पिके निघताच रब्बीची पिके पेरली होती.

दरम्यान या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणारी याचिका बालासाहेब अंबाड यांनी महाराष्ट्र शासन यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्या संदर्भात न्यायालयाने मार्च २०१९ रोजी अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला होता. तसेच प्रशासनाने अतिक्रमण हटविले नाही म्हणून अवमान याचिकाही दाखल होती. अतिक्रमणधारक भूमिहीन मोहन धीरे यांनीही अतिक्रमण हटविण्याच्या याचिकेविरुद्ध न्याय मागणारी याचिका दाखल केली होती. परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.

या सर्व बाबींची प्रशासनाने दखल घेत २८ डिसेंबरपासून अतिक्रमण हटविण्याची तयारी केली. पोलीस, महसूल व पंचायत समिती यांनी संयुक्त कार्यवाहीची सर्व तयारी केली.

गावाला छावणीचे स्वरूप

अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करीत असताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून स्वतः तहसीलदार, डीवायएसपी, गटविकास अधिकारी, युसुफवडगाव, केज, धारूर, नेकनूर व अंबाजोगाईचे येथील फौजफाटा तैनात होता.

बॅरिकेडसह अडथळे केले

अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होताना अतिक्रमणधारकांनी घराबाहेर पडून विरोध करू नये म्हणून त्यांच्या वस्तीला बॅरिकेटिंग आणि लाकडी अडथळे तयार करून मज्जाव केला होता. २९ डिसेंबर रोजी प्रचंड पोलीस बंदोबस्तात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले.

अतिक्रमणधारकांची घोषणाबाजी

पिकांवर नांगर फिरवून पिके उदध्वस्त केली जात असल्याची माहिती मिळताच अतिक्रमणधारक संतप्त झाले. त्यांनी गावातील हनुमान मंदिरासमोरील चौकात येऊन महिला, पुरुष यांनी घोषणाबाजी करून कार्यवाही थांबविण्याची मागणी केली.

गावात भीतीचे वातावरण

तहसीलदार मेंढके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू करीत असताना तहसीलचे कर्मचारी, गटविकास अधिकारी दराडे, पंचायत समितीचे कर्मचारी, डीवायएसपी भास्कर सावंत, १९ पोलीस अधिकारी, ११० पोलीस, दोन शीघ्र कृती दलाच्या तुकड्या असा बंदोबस्त होता. गावात कुणाही बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नव्हता.

महिलांच्या डोळ्यांत अश्रू आणि उद्रेक

कर्ज काढून अतिक्रमित गायरान जमिनीवर पेरलेली उभी पिके नष्ट केली जात असल्याची माहिती मिळताच महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांच्या संतापाचा उद्रेकही पाहायला मिळाला. आमचेच अतिक्रमण का काढता? म्हणत शेजारील शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढण्याची मागणी या वेळी तहसीलदार व डीवायएसपींकडे करण्यात आली.