शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

चौसाळा येथील स्वच्छतागृहाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:34 IST

नाले तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर बीड : शहरातील अंबिका चौक परिसरात सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी ...

नाले तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर

बीड : शहरातील अंबिका चौक परिसरात सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्तीदेखील वाढत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वीजचोरी वाढली

बीड : तालुक्यातील पिंपळनेर, नाथापूर परिसरात विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावामध्ये नेहमी वीजपुरवठा खंडित होण्यामध्ये वाढ झाली आहे. याकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

जैविक कचरा रस्त्यावर

वडवणी : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. यामध्ये सलाईनच्या बाटल्या, मुदतबाह्य औषधी, गोळ्यांची पाकिटे यांचा समावेश आहे. या जैविक कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याकडे न. पं. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावर खड्डे वाढले

केज : तालुक्यातील नांदूरघाट परिसरातील गावांमध्ये खड्डे वाढले आहेत. या रस्त्यावरून वाहनधारकांसह पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. तसेच पैसा आणि वेळ खर्ची पडत आहेत. खड्डे बुजविण्याची मागणी सोमनाथ जाधव यांनी केली आहे.

पांदण रस्ता करावा

बीड : तालुक्यातील बोरखेड येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जाणेदेखील शक्य होत नाही. त्यामुळे वेळोवेळी रस्ता करण्याची मागणी करूनदेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

पथदिवे बंद

बीड : शहरातील अंबिका चौक ते पांगरी रोड परिसरात रात्रीच्या वेळी पथदिवे बंद राहत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहन, तसेच नागरिक दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. यामुळे या भागातील पथदिवे दररोज सुरू ठेवावेत, जेणे करून गैरसोय टळेल अशी मागणी होत आहे.

गाजर गवताचा वेढा

पाटोदा : शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

मोकाट जनावरे वाढली

केज : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढली आहे. रस्त्यांवर बसलेल्या जनावरांमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून, अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी रहिवाशांमधून होत आहे.