शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुखद; ग्रामीण भागांत धावणार २७३, तर शहरांत १९० रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

सोमनाथ खताळ बीड : राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत. अर्थसंकल्पातील विशेष निधीतून ८९ कोटी ...

सोमनाथ खताळ

बीड : राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत. अर्थसंकल्पातील विशेष निधीतून ८९ कोटी रुपये खर्च करून ४६३ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. यात ग्रामीण भागात २६३, तर शहरांमध्ये १९० रुग्णवाहिका धावणार आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाकाळात सामान्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पहिल्या लाटेत कोरोनाबाबत भीती असल्याने रुग्णांना ने-आण करण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध होत नव्हते. तर सरकारी रुग्णवाहिका अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे रुग्ण वेळेवर रुग्णालयात जाण्यास अडचणी येत होत्या. तसेच कोरोनामुळे नॉन कोविड रुग्णांकडेही दुर्लक्ष झाले होते. उपलब्ध रुग्णवाहिकासुद्धा धोकादायक झाल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. हाच धागा पकडून शासनाने आरोग्य विभागाच्या विशेष निधीतून ८९ कोटी ४८ लाख रुपये खर्च करत ४६३ रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. याबाबत राज्याचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आदेश काढले आहेत. ज्या आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रुग्णालयांना रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत, त्याची यादीही जाहीर केली आहे. महिनाभरात या सर्व रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत येणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

--

कोणत्या जिल्ह्याला किती रुग्णवाहिका

राज्यात ४६३ रुग्णवाहिकांची यादी जाहीर केली आहे. यात अहमदनगर १४, अकोला २, अमरावती ४, भंडाडा ८, बीड ३१, बुलडाणा २१, चंद्रपूर २०, धुळे १, गडचिरोली १२, गोंदिया २५, हिंगोली ५, जळगाव ७, जालना ८, नंदूरबार ४, उस्मानाबाद १, पालघर १३, परभणी ११, पुणे १३, रायगड १२, रत्नागिरी ३१, सातारा २, सिंधुदुर्ग ११, सोलापूर ८, ठाणे ३, वर्धा ३, वाशिम ३ या अशा २७३ रुग्णवाहिका आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी वितरित केल्या आहेत. तसेच १९० रुग्णवाहिका या ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण, उपजिल्हा, स्त्री व इतर रुग्णालयांना जिल्हानिहाय दिल्या आहेत.

---

राजकारण्यांचा श्रेय घेण्याचा होणार प्रयत्न

राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच रुग्णवाहिका आल्या आहेत. त्यामुळे ज्या त्या जिल्ह्यातील राजकीय नेते, पुढारी यांच्याकडून या रुग्णवाहिका आपल्या प्रयत्नामुळेच आल्या, अशा बाता ठोकून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; परंतु या सर्व रुग्णवाहिका आरोग्य विभागाच्या निधीतून दिल्या आहेत. याच्याशी राजकारण्यांचा कसलाही संबंध नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.