शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

सुखद; ग्रामीण भागांत धावणार २७३, तर शहरांत १९० रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

सोमनाथ खताळ बीड : राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत. अर्थसंकल्पातील विशेष निधीतून ८९ कोटी ...

सोमनाथ खताळ

बीड : राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत. अर्थसंकल्पातील विशेष निधीतून ८९ कोटी रुपये खर्च करून ४६३ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. यात ग्रामीण भागात २६३, तर शहरांमध्ये १९० रुग्णवाहिका धावणार आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाकाळात सामान्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पहिल्या लाटेत कोरोनाबाबत भीती असल्याने रुग्णांना ने-आण करण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध होत नव्हते. तर सरकारी रुग्णवाहिका अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे रुग्ण वेळेवर रुग्णालयात जाण्यास अडचणी येत होत्या. तसेच कोरोनामुळे नॉन कोविड रुग्णांकडेही दुर्लक्ष झाले होते. उपलब्ध रुग्णवाहिकासुद्धा धोकादायक झाल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. हाच धागा पकडून शासनाने आरोग्य विभागाच्या विशेष निधीतून ८९ कोटी ४८ लाख रुपये खर्च करत ४६३ रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. याबाबत राज्याचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आदेश काढले आहेत. ज्या आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रुग्णालयांना रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत, त्याची यादीही जाहीर केली आहे. महिनाभरात या सर्व रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत येणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

--

कोणत्या जिल्ह्याला किती रुग्णवाहिका

राज्यात ४६३ रुग्णवाहिकांची यादी जाहीर केली आहे. यात अहमदनगर १४, अकोला २, अमरावती ४, भंडाडा ८, बीड ३१, बुलडाणा २१, चंद्रपूर २०, धुळे १, गडचिरोली १२, गोंदिया २५, हिंगोली ५, जळगाव ७, जालना ८, नंदूरबार ४, उस्मानाबाद १, पालघर १३, परभणी ११, पुणे १३, रायगड १२, रत्नागिरी ३१, सातारा २, सिंधुदुर्ग ११, सोलापूर ८, ठाणे ३, वर्धा ३, वाशिम ३ या अशा २७३ रुग्णवाहिका आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी वितरित केल्या आहेत. तसेच १९० रुग्णवाहिका या ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण, उपजिल्हा, स्त्री व इतर रुग्णालयांना जिल्हानिहाय दिल्या आहेत.

---

राजकारण्यांचा श्रेय घेण्याचा होणार प्रयत्न

राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच रुग्णवाहिका आल्या आहेत. त्यामुळे ज्या त्या जिल्ह्यातील राजकीय नेते, पुढारी यांच्याकडून या रुग्णवाहिका आपल्या प्रयत्नामुळेच आल्या, अशा बाता ठोकून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; परंतु या सर्व रुग्णवाहिका आरोग्य विभागाच्या निधीतून दिल्या आहेत. याच्याशी राजकारण्यांचा कसलाही संबंध नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.