शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सुखद; ग्रामीण भागांत धावणार २७३, तर शहरांत १९० रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

सोमनाथ खताळ बीड : राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत. अर्थसंकल्पातील विशेष निधीतून ८९ कोटी ...

सोमनाथ खताळ

बीड : राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत. अर्थसंकल्पातील विशेष निधीतून ८९ कोटी रुपये खर्च करून ४६३ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. यात ग्रामीण भागात २६३, तर शहरांमध्ये १९० रुग्णवाहिका धावणार आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाकाळात सामान्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पहिल्या लाटेत कोरोनाबाबत भीती असल्याने रुग्णांना ने-आण करण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध होत नव्हते. तर सरकारी रुग्णवाहिका अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे रुग्ण वेळेवर रुग्णालयात जाण्यास अडचणी येत होत्या. तसेच कोरोनामुळे नॉन कोविड रुग्णांकडेही दुर्लक्ष झाले होते. उपलब्ध रुग्णवाहिकासुद्धा धोकादायक झाल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. हाच धागा पकडून शासनाने आरोग्य विभागाच्या विशेष निधीतून ८९ कोटी ४८ लाख रुपये खर्च करत ४६३ रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. याबाबत राज्याचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आदेश काढले आहेत. ज्या आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रुग्णालयांना रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत, त्याची यादीही जाहीर केली आहे. महिनाभरात या सर्व रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत येणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

--

कोणत्या जिल्ह्याला किती रुग्णवाहिका

राज्यात ४६३ रुग्णवाहिकांची यादी जाहीर केली आहे. यात अहमदनगर १४, अकोला २, अमरावती ४, भंडाडा ८, बीड ३१, बुलडाणा २१, चंद्रपूर २०, धुळे १, गडचिरोली १२, गोंदिया २५, हिंगोली ५, जळगाव ७, जालना ८, नंदूरबार ४, उस्मानाबाद १, पालघर १३, परभणी ११, पुणे १३, रायगड १२, रत्नागिरी ३१, सातारा २, सिंधुदुर्ग ११, सोलापूर ८, ठाणे ३, वर्धा ३, वाशिम ३ या अशा २७३ रुग्णवाहिका आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी वितरित केल्या आहेत. तसेच १९० रुग्णवाहिका या ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण, उपजिल्हा, स्त्री व इतर रुग्णालयांना जिल्हानिहाय दिल्या आहेत.

---

राजकारण्यांचा श्रेय घेण्याचा होणार प्रयत्न

राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच रुग्णवाहिका आल्या आहेत. त्यामुळे ज्या त्या जिल्ह्यातील राजकीय नेते, पुढारी यांच्याकडून या रुग्णवाहिका आपल्या प्रयत्नामुळेच आल्या, अशा बाता ठोकून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; परंतु या सर्व रुग्णवाहिका आरोग्य विभागाच्या निधीतून दिल्या आहेत. याच्याशी राजकारण्यांचा कसलाही संबंध नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.