शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

सावडलेली राख सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

ग्राउंड रिपोर्ट पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील त्रिवेणी संगम असल्याने मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी सावडलेली राख सोडण्यासाठी ...

ग्राउंड रिपोर्ट

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील त्रिवेणी संगम असल्याने मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी सावडलेली राख सोडण्यासाठी व दशक्रिया विधीसाठी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. गोदावरी नदीच्या पलीकडील भागात राख सोडणे बंधनकारक करून दररोज विनापावती वरकमाई करण्याच्या नादात येथील ग्रामपंचायत येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना मात्र प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे.

या ठिकाणी वर्षानुवर्षापासून मृत व्यक्तीच्या विधीसाठी येणारे नागरिक हे दोन्ही नद्यांच्या पात्रात सावडलेली राख सोडत असत. परंतु मागील ५-६ वर्षात येथे येणाऱ्या नागरिकांकडून पैसे उकळण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विविध फंडे अवलंबिले जाऊ लागले. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात ग्रामपंचायतीच्या संगनमताने गोदावरी नदी पात्रात झिरा खोदून तेथील पाणी दहा रूपयांना एक हंडा याप्रमाणे विकण्यात आला. यातून मोठ्या प्रमाणात कमाई करण्यात आली.

अलिकडचे प्रदूषण टाळण्यासाठी पलिकडचे फर्मान

मागील सहा महिन्यांपासून येथील गोदावरी पात्र दुथडी भरलेले आहे. याचा फायदा घेत येथील ग्रामपंचायतीने राखेमुळे नदीपात्रात घाण होऊ नये, असे कारण पुढे करत नदीपात्राच्या पलिकडे राख सोडण्याचे अघाेषित फर्मान काढले. या नदीपात्रात मोठे थर्माकोल आणून राख सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसविले जाते. दोरीला ओढत गोदावरीच्या पलिकडील बाजूला सोडून परत आणले जाते. यासाठी मनमानी रक्कम नागरिकांकडून उकळली जात आहे.

गोरखधंद्यातील कमाई कोणाची?

दुखात असलेल्या नागरिकांना लुटण्याच्या गोरखधंद्यातून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. यापूर्वी एक हंड्याला दहा रूपये व आता गोदावरी नदीच्या पलीकडे जाऊन येण्यासाठी १५० ते २०० रूपये वसूल केले जातात. याची कोणालाही पावती दिली जात नाही. ही सर्व रक्कम कोणाच्या घशात जाते याची चौकशी होणे जरूरी आहे.

अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?

नदीपात्र पलिकडे असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना अलिकडे येण्यासाठी व जाण्यासाठी याच चप्पूचा वापर करावा लागत असून यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जाते. चप्पूवर लहान मुले , वृद्धांना घेऊन ५-६ लोकांना बसवून नेले जाते, येथील नागरिक भीतभीत सांगत होते. जर एखादे वेळी हा चप्पू पलटी होऊन मोठा अनर्थ झाला तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न विधीला येणाऱ्या नागरिकांना पडत असतो.

जलप्रदूषण टाळण्यासाठी सूचना

गोदावरी पात्रात तिसऱ्या दिवशी राख सोडण्यासाठी येणारे भाविक अलीकडेच राख सोडत असल्याने पाणी घाण होते म्हणून आम्ही राख गोदावरी पात्र पलिकडे सोडण्यास सांगतो. संतोष वाघमारे ,उपसरपंच ग्रामपंचायत मंजरथ.

===Photopath===

130421\13bed_2_13042021_14.jpg