शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सावडलेली राख सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

ग्राउंड रिपोर्ट पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील त्रिवेणी संगम असल्याने मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी सावडलेली राख सोडण्यासाठी ...

ग्राउंड रिपोर्ट

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथील त्रिवेणी संगम असल्याने मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी सावडलेली राख सोडण्यासाठी व दशक्रिया विधीसाठी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. गोदावरी नदीच्या पलीकडील भागात राख सोडणे बंधनकारक करून दररोज विनापावती वरकमाई करण्याच्या नादात येथील ग्रामपंचायत येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना मात्र प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे.

या ठिकाणी वर्षानुवर्षापासून मृत व्यक्तीच्या विधीसाठी येणारे नागरिक हे दोन्ही नद्यांच्या पात्रात सावडलेली राख सोडत असत. परंतु मागील ५-६ वर्षात येथे येणाऱ्या नागरिकांकडून पैसे उकळण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विविध फंडे अवलंबिले जाऊ लागले. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात ग्रामपंचायतीच्या संगनमताने गोदावरी नदी पात्रात झिरा खोदून तेथील पाणी दहा रूपयांना एक हंडा याप्रमाणे विकण्यात आला. यातून मोठ्या प्रमाणात कमाई करण्यात आली.

अलिकडचे प्रदूषण टाळण्यासाठी पलिकडचे फर्मान

मागील सहा महिन्यांपासून येथील गोदावरी पात्र दुथडी भरलेले आहे. याचा फायदा घेत येथील ग्रामपंचायतीने राखेमुळे नदीपात्रात घाण होऊ नये, असे कारण पुढे करत नदीपात्राच्या पलिकडे राख सोडण्याचे अघाेषित फर्मान काढले. या नदीपात्रात मोठे थर्माकोल आणून राख सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसविले जाते. दोरीला ओढत गोदावरीच्या पलिकडील बाजूला सोडून परत आणले जाते. यासाठी मनमानी रक्कम नागरिकांकडून उकळली जात आहे.

गोरखधंद्यातील कमाई कोणाची?

दुखात असलेल्या नागरिकांना लुटण्याच्या गोरखधंद्यातून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. यापूर्वी एक हंड्याला दहा रूपये व आता गोदावरी नदीच्या पलीकडे जाऊन येण्यासाठी १५० ते २०० रूपये वसूल केले जातात. याची कोणालाही पावती दिली जात नाही. ही सर्व रक्कम कोणाच्या घशात जाते याची चौकशी होणे जरूरी आहे.

अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?

नदीपात्र पलिकडे असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना अलिकडे येण्यासाठी व जाण्यासाठी याच चप्पूचा वापर करावा लागत असून यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जाते. चप्पूवर लहान मुले , वृद्धांना घेऊन ५-६ लोकांना बसवून नेले जाते, येथील नागरिक भीतभीत सांगत होते. जर एखादे वेळी हा चप्पू पलटी होऊन मोठा अनर्थ झाला तर याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न विधीला येणाऱ्या नागरिकांना पडत असतो.

जलप्रदूषण टाळण्यासाठी सूचना

गोदावरी पात्रात तिसऱ्या दिवशी राख सोडण्यासाठी येणारे भाविक अलीकडेच राख सोडत असल्याने पाणी घाण होते म्हणून आम्ही राख गोदावरी पात्र पलिकडे सोडण्यास सांगतो. संतोष वाघमारे ,उपसरपंच ग्रामपंचायत मंजरथ.

===Photopath===

130421\13bed_2_13042021_14.jpg