शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या भावनांशी खेळ; समुपदेशनाच्या नावाखाली १२ लाखांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

सोमनाथ खताळ बीड : शेतकरी आत्महत्या रोखण्यात प्रकल्प प्रेरणा विभागाला पूर्ण अपयश आलेले आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ३८८ ...

सोमनाथ खताळ

बीड : शेतकरी आत्महत्या रोखण्यात प्रकल्प प्रेरणा विभागाला पूर्ण अपयश आलेले आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ३८८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील केवळ ५३ शेतकरी कुटुंबांनाच भेट दिली आहे, तसेच कुटुंब व गावभेटीचे कारण सांगत तब्बल १३ लाख ६३ हजार रुपयांची उधळपट्टी या विभागाने केली आहे. यानिमित्ताने प्रकल्प प्रेरणा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळल्याने संताप व्यक्त होत आहे.

शेतकरी आत्महत्या थांबविण्याच्या उद्देशाने शासनाने पाच वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग स्थापन केला. एका मानसोपचारतज्ज्ञासह पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या विभागाने गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना तणावमुक्त करण्यासाठी शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम घेणे अपेक्षित असते; परंतु हा विभाग भेटीच्या नावाखाली पर्यटन दौरा करत बसला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबल्याच नसल्याचे दिसते. येथील अधिकारी, कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून केवळ लाखो रुपये निधीची उधळपट्टी करत असल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

---

८३ गावांसाठी १२ लाखांचा खर्च

या विभागाने तीन वर्षांत ३८८ पैकी केवळ ५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेट दिली आहे, तसेच ३० गावांत समुपदेशन केले. या ८३ गावांत जाण्यासाठी १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावरून यात मोठा घोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

---

वेतनावर पावणेदोन लाख खर्च

या विभागात काम करणाऱ्यांना प्रतिमहिन्याला १ लाख ७५ हजार रुपये वेतनावर खर्च केला जात आहे. एवढा खर्च होऊनही शेतकरी आत्महत्या रोखण्याऐवजी त्यांच्याकडून भेटीच्या नावाखाली पर्यटन दौरे केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

--

८ महिन्यांपासून विभाग बंदच

प्रकल्प प्रेरणा या विभागात मागील ८ महिन्यांपासून एकही कर्मचारी कार्यरत नाही. येथील सर्वच लोक मानसिक आरोग्य केंद्रात भरती झालेले आहेत. या विभागातही त्यांचे पहिले पाढे पढ पंचावन्न अशीच स्थिती आहे. कायम कामचुकारपणा करण्यासह शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी होत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही कार्यमुक्तीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

---

प्रकल्प प्रेरणा विभागातील आकडेवारीची माझ्याकडे अपडेट नाही. मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल. मग सांगतो.

-डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्यचिकित्सक, बीड