शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातून जात असलेल्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वी झाले होते. एकीकडे पुढे काम सुरू ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातून जात असलेल्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वी झाले होते. एकीकडे पुढे काम सुरू असतानाच काम झालेल्या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडत होत्या, तर पूल असलेल्या ठिकाणी मोठमोठे जम्प झाल्याने वाहने आदळत आहेत. जागोजागी खड्डे दिसू लागल्याने या नवीन रस्त्यावर आता अपघातास निमंत्रण मिळणार आहे.

विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. या कामाला तत्काळ सुरुवात करण्यात आली होती. या महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव व माजलगाव ते परतूर या ५०-५० किलोमीटरच्या अंतरासाठी वेगवेगळ्या कंपनीला टेंडर देण्यात आले होते. माजलगाव ते केज हे काम घेणाऱ्या कंपनीने हे काम ओबडधोबड करत दीड वर्षाच्या आत उरकून घेतले होते. या कंपनीने तर माजलगाव शहरातील रस्त्याची पूर्णपणे वाट लावत अत्यंत नित्कृष्ट दर्जाच्या नाल्या व रस्ता केल्याचा आरोप नागरिकांनी वारंवार केला होता; परंतु संबंधित कंपनीने कोणाचेही न ऐकता काही राजकीय मंडळीना हाताशी धरून रस्त्याची कामे उरकून घेतली होती. या रस्त्याचे काम पुढे चालू असताना आधी केलेल्या रस्त्याला भेगा पडत होत्या. संबंधित कंपनीने भेगा पडलेल्या ठिकाणी रस्ता फोडून तो दुरुस्त करण्याऐवजी त्यात डांबर व वाळू भरल्याने जागोजागी जम्प झाले आहेत, तर ज्या ठिकाणी पूल करण्यात आला आहे, त्या ठिकाणी रस्ता खाली-वर झाल्याने वेगाने जाणारी वाहने आदळत आहेत.

माजलगाव -केज रस्त्याबरोबरच माजलगाव-परतूर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन साडेतीन- चार वर्षे झाली. याचा दर्जादेखील अतिशय नित्कृष्ट होत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला होता, तर हा रस्ता सुरू असताना पाठीमागे झालेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगादेखील पडलेल्या आहेत.

माजलगाव शहरापासून दोन्ही बाजूला झालेल्या व चालू असलेल्या रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट असताना एकही राजकीय, सामाजिक नेते-कार्यकर्ते बोलायला तयार नाहीत.

केंद्र सरकारने तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गाला ५० वर्ष काहीच होणार नाही, असे एकीकडे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे सांगत आहेत; परंतु खामगाव-पंढरपूर या वारी मार्गाला पाच वर्षांच्या आतच तडे जाऊन खड्डे पडू लागले आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

===Photopath===

290521\img_20210527_133346_14.jpg~290521\img_20210527_132229_14.jpg