शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST

धारूर : पारंपरिक शेती परवडत नसल्याने खोडस येथील एका शेतकऱ्याने पेरुची लागवड करुन रक्ताचं घाम गाळून हाताच्या फोडाप्रमाणे ...

धारूर : पारंपरिक शेती परवडत नसल्याने खोडस येथील एका शेतकऱ्याने पेरुची लागवड करुन रक्ताचं घाम गाळून हाताच्या फोडाप्रमाणे दोन वर्ष ही बाग जपली. मात्र फळ खाण्याच्या वेळीच लॉकडाऊन लागले यामुळे फळे विकता आली नाही. पूर्ण फळे गळून त्याची जागेवरच माती झाली असून जवळपास सव्वा लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. खोडस येथील शेतकऱ्याप्रमाणे अन्य फळ उत्पादकांनाही लॉकडाऊनचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

तालुक्यातील खोडस येथील अंगद बाबूराव लाखे या तरुणाने पारंपरिक शेती सध्या परवडत नसल्याने फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. अर्ध्या एकरात इस्त्राईल पद्धतीने १० बाय ४ या प्रमाणे पेरुच्या पाचशे रोपांची लागवड केली. सलग दोन वर्ष या बागेची हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतली. दोन वर्षांनंतर यावर्षी फळे लगडली होती. फळांनी बहरून गेलेली बाग पाहून मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान वाटत होते. प्रति झाड १० किलो फळे निघाली तर जवळपास पाच टन उत्पादन व त्यातून सव्वा लाखांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र फळे काढणी आणि विक्रीला येताच शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित केले. तसेच आठवडे बाजारही बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याला पेरू कुठे विकता आले नाही तर व्यापाऱ्यांनी देखील खरेदी केला नाही. सर्व पेरु झाडालाच पिकून गळून पडली. दोन वर्षांच्या मेहनतीची डोळ्यासमोर माती होताना पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. लागवडीपासून ते आजपर्यंत जवळपास ४० हजार रुपये खर्च आला असून हा खर्च ही पदरमोड करावा लागला. गतवर्षी तसेच यंदाही लॉकडाऊन यामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात असे नुकसान यामुळे फळबाग लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

माझ्या कुटुंबात पूर्ण ११ एकर शेती आहे. यासाठी विहीर असून त्यास मात्र हंगामामध्ये पाणी असते. त्यामुळे ही कोरडवाहू शेती असून वेगळा प्रयोग करण्यासाठी पाणी पाहिजे म्हणून बोअर घेतला त्यास पाणी लागले. यावरच पेरू आणि लिंबू बाग लावली याचा पहिला बहार वाया गेला. यामुळे दोन्ही पिकांचे मिळून जवळपास पावणेदोन लाखांचे नुकसान झाले. - अंगद लाखे

शेतकरी, खोडस ता. धारुर

===Photopath===

040621\img-20210604-wa0201_14.jpg