शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

परळी-बीड-नगर रेल्वे २०१९ पर्यंत धावणार- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:41 IST

परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम वेगाने चालू असून, केंद्राप्रमाणेच राज्य शासनानेही या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. २०१९ पर्यंत या मार्गावरुन रेल्वे धावेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायणगडावर विकास कामांचे भूमिपूजन करताना व्यक्त केला.

ठळक मुद्देनारायणगडावर विविध विकास कामांचे भूमिपूजन

बीड : परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम वेगाने चालू असून, केंद्राप्रमाणेच राज्य शासनानेही या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. २०१९ पर्यंत या मार्गावरुन रेल्वे धावेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायणगडावर विकास कामांचे भूमिपूजन करताना व्यक्त केला.

अध्यक्षस्थानी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. बीडजवळच असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावरील २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी ते म्हणाले, बीड जिल्ह्यासाठी परळी-बीड-नगर हा रेल्वेमार्ग जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रकल्पासाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला, त्यांचे हे स्वप्न २०१९ पर्यंत पूर्ण होईल, यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जो काही निधी लागेल, तो दिला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत आशीर्वाद घेण्यासाठी मी नारायणगडावर आलो होतो. इथे ‘नगद’ आशीर्वाद मिळतो, अशी अख्यायिका आहे. माझ्या बाबतीतही ते सत्यात उतरले. भाजपची सत्ता आली आणि मी मुख्यमंत्री झालो. अतिशय निसर्गरम्य परिसरात हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी आणखीही दुस-या टप्प्यात भरीव मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आ. विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परिश्रम करुन पाठपुरावा केला. त्यांनी या गडाच्या विकासासाठी केलेल्या आराखड्यास २५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. याशिवाय या गडाला विकसित करण्यासाठी सर्वच खात्याच्या विविध विकास योजना इथे राबविल्या जातील, असे ते म्हणाले.

कर्जमुक्तीसाठी उर्वरित शेतक-यांचे अर्ज भरुन घेऊकर्जमुक्तीचा लाभ ५० लाख शेतक-यांना आतापर्यंत झाला आहे. बीड जिल्ह्यातही १ लाख ५ हजार शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत. ज्या कुणाचे कर्जमुक्तीसाठी अर्ज दाखल झाले नाहीत, त्यांचेही अर्ज भरुन घेऊन पात्र शेतक-यांना कर्जमुक्ती दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.