शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

परळी-बीड-नगर रेल्वे २०१९ पर्यंत धावणार- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:41 IST

परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम वेगाने चालू असून, केंद्राप्रमाणेच राज्य शासनानेही या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. २०१९ पर्यंत या मार्गावरुन रेल्वे धावेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायणगडावर विकास कामांचे भूमिपूजन करताना व्यक्त केला.

ठळक मुद्देनारायणगडावर विविध विकास कामांचे भूमिपूजन

बीड : परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम वेगाने चालू असून, केंद्राप्रमाणेच राज्य शासनानेही या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. २०१९ पर्यंत या मार्गावरुन रेल्वे धावेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायणगडावर विकास कामांचे भूमिपूजन करताना व्यक्त केला.

अध्यक्षस्थानी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. बीडजवळच असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावरील २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी ते म्हणाले, बीड जिल्ह्यासाठी परळी-बीड-नगर हा रेल्वेमार्ग जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रकल्पासाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला, त्यांचे हे स्वप्न २०१९ पर्यंत पूर्ण होईल, यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जो काही निधी लागेल, तो दिला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत आशीर्वाद घेण्यासाठी मी नारायणगडावर आलो होतो. इथे ‘नगद’ आशीर्वाद मिळतो, अशी अख्यायिका आहे. माझ्या बाबतीतही ते सत्यात उतरले. भाजपची सत्ता आली आणि मी मुख्यमंत्री झालो. अतिशय निसर्गरम्य परिसरात हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी आणखीही दुस-या टप्प्यात भरीव मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आ. विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परिश्रम करुन पाठपुरावा केला. त्यांनी या गडाच्या विकासासाठी केलेल्या आराखड्यास २५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. याशिवाय या गडाला विकसित करण्यासाठी सर्वच खात्याच्या विविध विकास योजना इथे राबविल्या जातील, असे ते म्हणाले.

कर्जमुक्तीसाठी उर्वरित शेतक-यांचे अर्ज भरुन घेऊकर्जमुक्तीचा लाभ ५० लाख शेतक-यांना आतापर्यंत झाला आहे. बीड जिल्ह्यातही १ लाख ५ हजार शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत. ज्या कुणाचे कर्जमुक्तीसाठी अर्ज दाखल झाले नाहीत, त्यांचेही अर्ज भरुन घेऊन पात्र शेतक-यांना कर्जमुक्ती दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.