शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:25 IST

माजलगाव : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता नगरपालिकेने दरमहा साडेसात लाख रुपये खर्च करून टेंडर काढले होते. परंतु, ...

माजलगाव : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता नगरपालिकेने दरमहा साडेसात लाख रुपये खर्च करून टेंडर काढले होते. परंतु, या टेंडर धारकाकडून नागरिकांना कधी हिरवे, कधी पिवळे, तर गाळयुक्त पाणी दिले जात असताना याकडे ना नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे, ना मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष आहे. यामुळे नगरपालिकेला दरमहा मोठा फटका बसू लागला आहे.

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या काळात माजलगाव शहर व अकरा पुनर्वसित गावांना माजलगाव धरणाच्या बाजूला असलेल्या जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या जलशुद्धिकरण केंद्रावरील जलशुद्धिकरण केंद्र दुरुस्तीच्या अभावामुळे या गावच्या नागरिकांना मागील दोन वर्षांपासून विना फिल्टर केलेले व अशुद्ध पाणी जे की डायरेक्ट धरणातून येते, तेच पाणी नगरपालिकेद्वारा पाजले जात असे. परंतु नगरपालिकेत सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन उपाध्यक्षा सुमनबाई मुंडे यांच्याकडे नगराध्यक्षांचा पदभार दिल्यानंतर त्यांनी प्रथम हे जलशुद्धिकरण केंद्र स्वच्छ व दुरुस्त करून या गावांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी टेंडर काढले होते. यानंतर संबंधित ठेकेदाराने सुरुवातीला जलशुद्धिकरण केंद्र दुरुस्त केले व त्यानंतर मिनरल वाॅटरच्या बाॅटलप्रमाणे या ठिकाणाहून पाणी मिळेल असे या ठेकेदाराकडून सांगितले जात होते.

सुरुवातीला ४-८ दिवस पाण्याचा दर्जा चांगला पाहावयास मिळू लागला. परंतु, काही दिवसांतच या पाण्यात कधी तुरटी, तर कधी ब्लिचिंग न टाकताच पाणी सोडले जात असल्याने पाणी अशुद्ध होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

यानंतर अनेक वेळा तर पाणीच फिल्टर न करताच तसेच सोडण्यात येत असल्याचे या फिल्टरवरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे कधी हिरवे, तर कधी पिवळ्या रंगाचे पाणी नळाद्वारे येत आहे. तर या येत असलेल्या पाण्यात एका हंड्यात ५० ग्रॅमपेक्षा जास्त गाळ खाली साचलेला दिसून येत आहे.

टेंडरचालकास नगरपालिकेकडुन या बदल्यात दरमहा साडेसात लाख रुपये दिले जात आहेत. येथील नगरपालिका दरमहा मोठ्या प्रमाणावर खर्च करत असताना मात्र नागरिकांना कशाही रंगातील पाणी पिण्याची वेळ येत असल्याने येथील नागरिकांना पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाये उस जैसा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मुख्याधिकारी म्हणतात, टेंडर बंद करू

येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना या पाण्याबाबत अनेक वेळा विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणतात, याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी येत असल्याने हे टेंडर बंद करू. असेच अनेक वेळा उत्तर मिळताना दिसते व याबाबत ते फक्त फोनवरच माहिती घेतात. त्यांनी कधीही या जलशुद्धिकरण केंद्रावर जाऊन पाहणीच केलेली नाही. यामुळे या पाण्याबद्दल त्यांना कसलीच माहिती नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून वारंवार केला जातो.

धरणाच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने धरणाच्या कडेच्या भागात असलेला गाळ पाण्यासोबत येत असल्याने पाणी खराब येत आहे. आता हा गाळ हटविण्यात आला असून, आता पुन्हा शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे.

शेख मंजूर, नगराध्यक्ष माजलगाव न. प.