शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:25 IST

माजलगाव : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता नगरपालिकेने दरमहा साडेसात लाख रुपये खर्च करून टेंडर काढले होते. परंतु, ...

माजलगाव : शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता नगरपालिकेने दरमहा साडेसात लाख रुपये खर्च करून टेंडर काढले होते. परंतु, या टेंडर धारकाकडून नागरिकांना कधी हिरवे, कधी पिवळे, तर गाळयुक्त पाणी दिले जात असताना याकडे ना नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे, ना मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष आहे. यामुळे नगरपालिकेला दरमहा मोठा फटका बसू लागला आहे.

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या काळात माजलगाव शहर व अकरा पुनर्वसित गावांना माजलगाव धरणाच्या बाजूला असलेल्या जलशुद्धिकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या जलशुद्धिकरण केंद्रावरील जलशुद्धिकरण केंद्र दुरुस्तीच्या अभावामुळे या गावच्या नागरिकांना मागील दोन वर्षांपासून विना फिल्टर केलेले व अशुद्ध पाणी जे की डायरेक्ट धरणातून येते, तेच पाणी नगरपालिकेद्वारा पाजले जात असे. परंतु नगरपालिकेत सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन उपाध्यक्षा सुमनबाई मुंडे यांच्याकडे नगराध्यक्षांचा पदभार दिल्यानंतर त्यांनी प्रथम हे जलशुद्धिकरण केंद्र स्वच्छ व दुरुस्त करून या गावांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी टेंडर काढले होते. यानंतर संबंधित ठेकेदाराने सुरुवातीला जलशुद्धिकरण केंद्र दुरुस्त केले व त्यानंतर मिनरल वाॅटरच्या बाॅटलप्रमाणे या ठिकाणाहून पाणी मिळेल असे या ठेकेदाराकडून सांगितले जात होते.

सुरुवातीला ४-८ दिवस पाण्याचा दर्जा चांगला पाहावयास मिळू लागला. परंतु, काही दिवसांतच या पाण्यात कधी तुरटी, तर कधी ब्लिचिंग न टाकताच पाणी सोडले जात असल्याने पाणी अशुद्ध होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

यानंतर अनेक वेळा तर पाणीच फिल्टर न करताच तसेच सोडण्यात येत असल्याचे या फिल्टरवरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे कधी हिरवे, तर कधी पिवळ्या रंगाचे पाणी नळाद्वारे येत आहे. तर या येत असलेल्या पाण्यात एका हंड्यात ५० ग्रॅमपेक्षा जास्त गाळ खाली साचलेला दिसून येत आहे.

टेंडरचालकास नगरपालिकेकडुन या बदल्यात दरमहा साडेसात लाख रुपये दिले जात आहेत. येथील नगरपालिका दरमहा मोठ्या प्रमाणावर खर्च करत असताना मात्र नागरिकांना कशाही रंगातील पाणी पिण्याची वेळ येत असल्याने येथील नागरिकांना पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाये उस जैसा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मुख्याधिकारी म्हणतात, टेंडर बंद करू

येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना या पाण्याबाबत अनेक वेळा विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणतात, याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी येत असल्याने हे टेंडर बंद करू. असेच अनेक वेळा उत्तर मिळताना दिसते व याबाबत ते फक्त फोनवरच माहिती घेतात. त्यांनी कधीही या जलशुद्धिकरण केंद्रावर जाऊन पाहणीच केलेली नाही. यामुळे या पाण्याबद्दल त्यांना कसलीच माहिती नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून वारंवार केला जातो.

धरणाच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने धरणाच्या कडेच्या भागात असलेला गाळ पाण्यासोबत येत असल्याने पाणी खराब येत आहे. आता हा गाळ हटविण्यात आला असून, आता पुन्हा शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे.

शेख मंजूर, नगराध्यक्ष माजलगाव न. प.