शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४० लाखांचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या दिशेने गत दोन वर्षांपूर्वी साधारण १२५ बसेस धावल्या होत्या. परंतु, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या दिशेने गत दोन वर्षांपूर्वी साधारण १२५ बसेस धावल्या होत्या. परंतु, गत वर्षांपासून कोरोनामुळे लालपरी जागेवरच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी लालपरीला जवळपास ४० लाख रुपयांचा फटका बसला आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून सध्या प्रवाशांसाठी बीडमध्ये कसल्याच सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.

नियंत्रकांना विभागाची माहितीच नाही

जिल्ह्यातील बसेस, उत्पन्न, कर्मचारी, अस्थापना, आगार, बसस्थानक ही सर्व माहिती विभागीय नियंत्रक पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याला तोंडपाठ असणे आवश्यक असते. यापूर्वीचे अधिकारी तेवढे तत्परही होते.

परंतु, नुकताच पदभार घेतलेले अजय मोरे यांना कसलीच माहिती नव्हती. रत्नागिरीला आगारप्रमुख राहिलेले मोरे थेटे नियंत्रक झाल्याने हवेत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर यांनी केला आहे.

प्रवाशांच्या हितासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करून प्रत्येक गावात बस सोडावी. वेळीच यात सुधारणा झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही वाईकर यांनी दिला आहे.

बीड बसस्थानकात सर्वत्र धाणच घाण

बीड बसस्थानकात सध्या सर्वत्र घाणच घाण आहे. थोडाही पाऊस झाला की तलावाचे स्वरूप येते. यामुळेच या बसस्थानकाकडे प्रवासी फिरकत नसल्याचे दिसत आहे. दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

उद्या माहिती देतो

सलग दोन वर्षापासून आषाढी एकादशीसाठी धावणाऱ्या बसेस बंद आहेत. किती उत्पन्न मिळत होते, आणि किती तोटा झाला, याची माहिती मी उद्या देतो. मी १० दिवसांपूर्वीच रुजू झालो आहे.

- अजय मोरे, विभागीय नियंत्रक बीड