शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

...अन्यथा राज्यातील आरोग्य सेवा बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:36 IST

बीड : वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना आमदार रणजीत कांबळे यांनी शिवीगाळ केली. याचे पडसाद ...

बीड : वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना आमदार रणजीत कांबळे यांनी शिवीगाळ केली. याचे पडसाद सोमवारी पूर्ण राज्यभर उमटले. या प्रकरणाचा निषेध करण्यासह आमदारांवर कारवाई करावी, अन्यथा राज्यातील सर्व आरोग्य सेवा बंद करण्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी स्ंघटनेने दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठविले आहे. शिवीगाळ प्रकाराने मात्र राज्यातील आरोग्य विभागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाची महामारी सुरू आहे. यात सर्वात पुढे होऊन आरोग्य विभाग काम करीत आहे. वर्षभरापासून अधिकारी, कर्मचारी सुटी न घेता २४ तास सेवा देत आहेत. त्यामुळे ते तणावात आहेत. त्यांना लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी आधार देण्यासह सहकार्य करण्याची गरज आहे. परंतु, वर्धा येथे संतापजनक प्रकार घडला आहे. वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डवले यांना काेरोना चाचणी शिबिरावरून देवळी-पुलगाव विधासनभा मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे यांनी कॉल करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच अश्लिल शिवीगाळ करीत पोलीस ठाण्यात येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार समजताच राज्यातील आरोग्य विभाग आक्रमक झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने तत्काळ मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आदींना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. वेळीच यावर दखल घेतली नाही तर राज्यात कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

बीडमध्ये डॉक्टरला मारहाण, पण तक्रारच नाही

चार दिवसांपूर्वी बीडमध्ये कर्तव्यावर जाणाऱ्या डॉ. विशाल वनवे यांना पोलिसांनी मारहाण केली होती. परंतु, डॉ.वनवे यांनी तक्रार न दिल्याने हे प्रकरण मिटले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता वर्धात चक्क जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी असुरक्षित असल्याचे सिद्ध होत आहे. यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वर्षभरापासून राज्यात सर्वत्रच आमची यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. जीव धोक्यात घालण्यासह तणावात काम केले जात आहे. अशा स्थितीत आम्हांला आधार देण्याऐवजी अपमानास्पद वागणूक देण्यासह शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता आम्ही शांत बसणार नाहीत. संंबंधित आमदारांवर कडक कारवाई झाली नाही तर राज्यातील सर्व आरोग्य सेवा बंद करू. आता सहनशिलता संपली आहे.

डॉ. आर. बी. पवार, अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, महाराष्ट्र