शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होतेय गळचेपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : कोरोना काळात बंद ठेवलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या परळीमार्गे अद्यापही सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : कोरोना काळात बंद ठेवलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या परळीमार्गे अद्यापही सुरु न झाल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्य व परराज्यातील भाविकांना कार, ट्रक वा टेम्पो करून परळीत यावे लागत आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या गेल्या १० महिन्यांपासून बंद असून, त्या सुरू करण्याची मागणी नागरिक व प्रवासी संघटनेने केली आहे. पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने परळीच्या अर्थकारणावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. कारोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून रेल्वे प्रशासनाने परळी रेल्वे स्थानकमार्गे धावणाऱ्या परळी-मिरज, परळी-पंढरपूर, परळी -अकोला, नांदेड-पंढरपूर ,परळी-आदिलाबाद, हैद्राबाद-पूर्णा या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. गेल्या १० महिन्यांपासून बंद असलेल्या या रेल्वे अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे तसेच रेल्वेने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय होत आहे.

परळी रेल्वे स्थानकातून नोव्हेंबरपासून एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू केल्या नसल्याने परळीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कार वा ट्रकने यावे लागत आहे. आदिलाबाद येथून ५०० भाविक दत्तजयंती दिवशी परळीत वैजनाथाच्या दर्शनासाठी ट्रक, टेम्पो करून आले होते. तसेच इतर ठिकाणांहूनही भाविक स्वतंत्रपणे वाहन करून येत आहेत. पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने अनेक भाविकांना परळीला येणे गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे वैजनाथ मंदिर परिसरातील उलाढालीवरही परिणाम झाला आहे. शहरातील रिक्षा व्यवसायासह लॉजिंग, हॉटेल, फळविक्रेते व इतर व्यवसायांनाही याचा फटका बसत असल्याची माहिती वैजनाथ मंदिराचे पुरोहित नितीन राजूरकर यांनी दिली.

रेल्वे प्रशासनाने परळीमार्गे धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात. यामुळे पासधारक, सर्वसामान्य प्रवाशांची निश्चितच सोय होईल. परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा येथे व्यवसाय, नाेकरीनिमित्त जाणाऱ्या प्रवाशांचीही यामुळे सोय होईल. - जी. एस. सौंदले, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, परळी-वैजनाथ.

परळी रेल्वे स्थानकमार्गे एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. परंतु, पॅसेंजर रेल्वेगाड्यांबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचे रेल्वेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.