शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भूमिपुत्र म्हणून संधीचं सोनं केलं; आता साताऱ्यातही ‘बीड पॅटर्न’ दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

बीड : अगोदर नॉन कोविड आणि आता कोविडकाळात जीव धोक्यात घालून टीमला सोबत घेऊन जिल्ह्यात नवनवीन संकल्पना, उपक्रम राबवून ...

बीड : अगोदर नॉन कोविड आणि आता कोविडकाळात जीव धोक्यात घालून टीमला सोबत घेऊन जिल्ह्यात नवनवीन संकल्पना, उपक्रम राबवून सेवा दिली. खरंतर, जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मला ही संधीच मिळाली होती. मी पण याचे सोने केले. आता बदली झाली म्हणून खचणाऱ्यांतील मी नाही. साताऱ्यातही 'बीड पॅटर्न' राबविण्याचा प्रयत्न करेल, असे सांगताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार भावुक झाले. कोरोना महामारीत त्यांनी बीडकरांसाठी दिलेली सेवा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असेल.

पाटोदा तालुक्यातील कुसळंब गावचे डॉ. पवार रहिवासी. आदर्श गावातील हे व्यक्तिमत्त्व आता आरोग्य विभागात आपली छाप पाडत आहे. २०१७ साली डॉ. पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रांना आलेली मरगळ झटकून तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना विश्वासात घेत सामान्यांसाठी सेवेला लावले. उपकेंद्राच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करून गावातच उपचार सुरू केले. गर्भवती मातांना स्त्रीरोगतज्ज्ञामार्फत तपासणी करून त्यांची प्रसूती आरोग्य केंद्रातच व्हावी, यासाठी प्रयत्न केेले. तसेच मागील साडेतीन वर्षांत आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सुरू केल्या. लोकाभिमुख व लाभदायक उपाययोजना व सुविधा देऊन डॉ. पवार हे आता सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारीपदावर जाणार आहेत. शासनाने त्यांचे मंगळवारी आदेश काढले आहेत. त्यांच्या जाण्याने बीडकरांनी एक चांगला अधिकारी गमावला असून नव्या अधिकाऱ्यानेही अशीच सेवा बजावावी, अशी अपेक्षा आहे.

मी नाही, तर माझे काम बोलते

जिल्ह्यातील शासकीय संस्थांमध्ये १ लाख ८६ हजार २५५ प्रसूती, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत ६६ हजार ४२३ मातांना २८ कोटी रुपयांचा लाभ, सुरक्षा अभियानांतर्गत ८३ हजार ३०३ गर्भवतींची तपासणी व ४५ हजार ६९६ मातांची मोफत सोनोग्राफी, गोवर मिझल व रूबेला मोहिमेंतर्गत ६ लाख ४३ हजार ८९२ लसीकरण, कायाकल्पमध्ये १८ आरोग्य केंद्रांना बक्षीस, कोरोनात १८ लाख १० हजार लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यासह तंत्रज्ञानाचा अवलंब करून सामान्यांना लाभ मिळवून दिला.

बीडकरांचे प्रेम, सहकाऱ्यांची साथ हृदयात ठेवणार

मी भूमिपुत्र असलो तरी प्रशासक आहे. एक अधिकारी म्हणून बीडकरांनी दिलेले प्रेम आणि तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच शिपाई ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली साथ व केलेल्या मार्गदर्शनामुळेच बीडचे नाव राज्यात अव्वल ठेवण्यात यश आल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.