शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

जिल्ह्यात फक्त दहा सिंचन विहिरी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST

बीड : रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी इच्छुक आहेत. मात्र, पंचायत समितींमधील अधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती व राजकीय ...

बीड : रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी इच्छुक आहेत. मात्र, पंचायत समितींमधील अधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती व राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे चालू वर्षात जिल्हाभरातून वैयक्तिक विहिरीसाठी फक्त ३५ विहिरींचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्येदेखील फक्त पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. ४ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार विहीर मंजूर करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून काढून संबंधित गटविकास अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व प्रस्ताव वापस पाठवण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना शेतात शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाची विहीर देण्यात येते. यासाठी जवळपास तीन लाख रुपये निधी मिळतो. बीड पंचायत समितीअंतर्गत झालेल्या ५३५ जलसिंचन विहिरींचे प्रकरण न्यायालयात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई झाली होती. त्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांनुसारच प्रत्येक गावात लोकसंख्येनुसार पाच विहिरी मंजूर करण्यात येणार होत्या. त्यासाठी ३५ प्रस्तावदेखील पंचायत समिती स्तरावरून प्राप्त झाले. मात्र, फक्त दहा सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्याचे चित्र आहे.

दरम्यान, ४ मार्च रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार विहीर मंजूर करण्याचे अधिकार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मंजूर नसलेले प्रस्ताव पुन्हा परत पाठविण्यात आले आहेत. मात्र, वैयक्तिक लाभाच्या विहिरींना तात्काळ मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

तालुकानिहाय प्रस्ताव

बीड १०

वडवणी ५

शिरूर १०

पाटोदा १०

................

३५ प्रस्ताव प्राप्त

१० मंजूर

नरेगाच्या कामासंदर्भात अधिकारी नकारात्मक

नरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कामे झालेले आहेत. मात्र, काही ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होत. दरम्यान, नरेगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नकारात्मक भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मागील वर्षीचा नरेगाचा खर्च सर्वात कमी असल्याचे चित्र आहे.

इतर कामांनादेखील खीळ

पंचायत समितीच्या माध्यमातून जलसिंचन विहीरसोबतच अनेक कामे केली जातात. मात्र, जवळपास सर्वच पंचायत समितीच्या माध्यमातून होणारी कामे ठप्प असल्याचे चित्र आहे. यामध्ये शेतततळे, वृक्ष लागवड संगोपण, गायगोठा, कांदाचाळ यासह इतर कामे कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

कामे सुरू करण्याची मागणी

नरेगा हा ग्रामीण भागातील विकासाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे ग्रामीण विकासासाठी नरेगाअंतर्गत असल्येल्या योजनांना अधिकाऱ्यांनी चालना द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.