शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत केवळ २५६ गावे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ...

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व महसूल विभागाला दिले होते. यात केवळ २५६ गावांत नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. यात सहा तालुक्यातील एकाही गावात नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नुकसानीत गेवराई तालुक्यातील १८३ व बीड तालुक्यातील ५३ गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यामध्ये गेवराई तालुक्यातील १८३, बीडमधील ५३ तर आष्टी तालुक्यातील सहा, वडवणी ११ व धारूर तालुक्यातील एका गावात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तर, परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव, शिरूर, आष्टी, पाटोदा या तालुक्यात एकाही गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. हा प्राथमिक अंदाज असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुन्हा महसूल व कृषी विभाग संयुक्त जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

एक लाख २५ हजार ९० शेतकऱ्यांचे नुकसान

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात २५६ गावांमधील एक लाख २५ हजार ९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ९४ हजार हेक्टरवरील पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये सर्व क्षेत्र हे जिरायती असून, १५८५ हेक्टरील फळबागांचे नुकसान झाले झाल्याचे अहवालात नमूद आहे.