शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

अतिवृष्टीत केवळ २५६ गावे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ...

बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व महसूल विभागाला दिले होते. यात केवळ २५६ गावांत नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. यात सहा तालुक्यातील एकाही गावात नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नुकसानीत गेवराई तालुक्यातील १८३ व बीड तालुक्यातील ५३ गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यामध्ये गेवराई तालुक्यातील १८३, बीडमधील ५३ तर आष्टी तालुक्यातील सहा, वडवणी ११ व धारूर तालुक्यातील एका गावात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तर, परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव, शिरूर, आष्टी, पाटोदा या तालुक्यात एकाही गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. हा प्राथमिक अंदाज असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुन्हा महसूल व कृषी विभाग संयुक्त जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

एक लाख २५ हजार ९० शेतकऱ्यांचे नुकसान

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात २५६ गावांमधील एक लाख २५ हजार ९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ९४ हजार हेक्टरवरील पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये सर्व क्षेत्र हे जिरायती असून, १५८५ हेक्टरील फळबागांचे नुकसान झाले झाल्याचे अहवालात नमूद आहे.