शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात केवळ १५ टक्के कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:04 IST

नगर परिषद व नगर पंचायत यांच्या वतीने विविध कर आकारला जातो; परंतु मागील काही दिवसांपासून न.प. व पालिकांनी कर वसुली करण्यास उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा पालिका व पाच नगर पंचायतींची केवळ १५.४० टक्केच वसुली झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकेज अग्रेसर तर पाटोद्याची केवळ २ टक्के वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नगर परिषद व नगर पंचायत यांच्या वतीने विविध कर आकारला जातो; परंतु मागील काही दिवसांपासून न.प. व पालिकांनी कर वसुली करण्यास उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा पालिका व पाच नगर पंचायतींची केवळ १५.४० टक्केच वसुली झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये केज २७ टक्क्यांनी अग्रेसर असून, पाटोद्याची केवळ २ टक्के वसुली आहे.

नगरपालिका व नगर पंचायतीच्या वतीने मालमत्ता, पाणीपट्टी, शिक्षण फंड, रोजगार हमी यासारखे विविध कर आकारले जातात. या कराद्वारे मिळालेल्या रकमेतून पालिका कर्मचाºयांचे वेतन, शहर विकास निधीसाठी खर्च केला जातो; परंतु मागील काही दिवसांपासून पालिका व पंचायतच्या गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिली आहे.

सध्या नगर पालिका व पंचायतींकडे तब्बल ३६ कोटी ५३ लाख ९७ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यातील केवळ ५ कोटी ६२ लाख ६६ हजार रुपयांची म्हणजेच १५.४० टक्के वसुली झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. यावरून पालिकांची वसुलीसंदर्भातील उदासीनता स्पष्ट दिसून येते. वसुली करण्यासंदर्भात पालिका व पंचायतींना कडक आदेश देण्याची गरज आहे.अधिकारी - कर्मचा-यांचे दुर्लक्षपालिका, पंचायत विभागातील वसुली विभागातील अधिकारी, कर्मचारी वसुली करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे नगरपालिकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वसुली विभागातील संबंधित अधिकाºयांकडून सक्तीने वसुली करण्यासंदर्भात वरिष्ठांकडून दबाव आणला जात नसल्यानेच ही परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे.

वसुलीच्या नावाखाली कर्मचा-यांची दांडीवसुली विभागातील अधिकारी, कर्मचारी वसुली करण्याच्या नावाखाली कार्यालयातून बाहेर पडतात; परंतु करवसुली न करताच ते इतरत्र फिरत असल्याचे समोर आले आहे. कार्यालयात सहीपुरतीच हजेरी लावण्यापुरतीच त्यांची जबाबदारी असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा कामचुकार कर्मचा-यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.