शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

सखाराम शिंदे गेवराई : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक कमी झाल्याने व भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गोरगरीब व मध्यमवर्गीयाच्या ...

सखाराम शिंदे

गेवराई : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक कमी झाल्याने व भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गोरगरीब व मध्यमवर्गीयाच्या घरातून कांदा गायब झाला आहे. त्याचबरोबर आता हाॅटेलमध्येसुध्दा कांद्याऐवजी पत्ताकोबी, टोमॅटो, काकडीचा वापर होताना दिसत आहे.

या कांद्याने अक्षरश: सामान्याच्या तोंडची चवच पळविली आहे. कांदा न भाकर घेऊ द्या की रं, मला बी जत्रंला येऊ द्या की रं, असे गाणे फार वर्षांपूर्वी एका चित्रपटात होते. त्याप्रमाणे कांदा सहज कोठेही उपलब्ध होत होता. तसेच शहरातील नव्हे, तर तालुक्यातील सर्वच हाॅटेल, भोजनालय, भेळ सेंटर, भज्याची गाडे यावर नेहमी मोठ्या प्रमाणात कांदा मिळत होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने भाव वाढले. आजमितीला बाजारात कांद्याचा भाव हा ४० ते ५० रुपये किलोदराने विकला जात असल्याने गरीब व मध्यमवर्गीयांचा जेवणातील आवडता कांदा आता गायब झाला असून फक्त श्रीमंताच्या घरात कांदा दिसत आहे.

आजमितीला शहरातील व ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणच्या भज्याच्या गाडीवर आता कांद्याऐवजी पत्ताकोबीचा वापर केला जात आहे. तसेच हाॅटेल, भोजनालय व भेळ सेंटरवरही कांद्याऐवजी पत्ताकोबी, टोमॅटो, काकडी यांचा वापर होत असल्याने हाॅटेलमध्येसुध्दा सहज मिळणारा कांदा आता दिसेनासा झाला असल्याचे येथील अभिजित ठाकूर, पप्पू जैस्वाल यांनी सांगितले.

कांद्याची आवक कमी झाल्याने व कांदा आम्हाला जास्त भावाने येत असल्याने तो जास्त भावानेच विकावा लागत असल्याचे येथील व्यापारी विलास जंवजाळ यांनी सांगितले.