शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

वर्षभरातून एकदाच महिलांसाठी उघडतात 'या' मंदिराचे दरवाजे !

By admin | Updated: November 14, 2016 11:54 IST

पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील कार्तिक स्वामींचे राज्यातील आद्य मंदिर म्हणून उल्लेख होणा-या प्राचीन मंदिराचे दरवाजे महिलांसाठी वर्षभरातून एकदाच कार्तिकी पौर्णिमेला उघडतात.

- प्रताप नलावडे, ऑनलाइन लोकमत
 
बीड, दि. १४ -  कार्तिक स्वामींचे राज्यातील आद्य मंदिर म्हणून उल्लेख होत असलेल्या पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राचीन मंदिराचे दरवाजे वर्षभरातून केवळ एकच दिवस महिलांसाठी उघडतात. सोमवारी (आज) कार्तिकी पोर्णिमेच्या निमित्ताने दिवसभर महिलांना मंदिर खुले असून मराठवाड्यातून महिला भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असल्याची माहिती अश्वलिंग संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. मधुकर महाराज यांनी दिली. 
 
वर्षभर या मंदिरात विविध धार्मिक सोहळे सुरू असले तरी महिलांना मात्र वर्षभरातून एकदाच दर्शन घेता येते. प्राचीन परंपरेनुसार कार्तिक स्वामीच्या जन्म सोहळ्याच्या म्हणजे कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येतो. रात्री उशीरापर्यंत दर्शन घेता येते. वर्षभरातून एकदाच होणा-या या सोहळ्यासाठी मराठवाड्यातून भाविक महिला येथे येतात. बीड पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आणि कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावर हे मंदिर आहे.
 
पिंपळवंडी येथील कार्तिक स्वामीचे हे मंदिर आठशे वर्षापूर्वीचे असून अश्वलिंग संस्थानचे गंगाभारती महाराज यांनी मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. कार्तिक स्वामीची मुर्ती सहा मुखांची असून प्राचीन मुर्तीची झीज झाली असल्याने गतवर्षी अशीच सहा मुखाची आणि मयुरावर बसलेल्या मुर्तीची संस्थानच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जुनी मूर्ती पाषाणाची असून तिची उंची दोन फूट आहे. सहा मुखाची ही मूर्ती मयुरावर बसलेली आहे. नव्याने तयार केलेल्या मूर्तीची उंची चार फुटाची असून या दोन्ही मूर्ती एकाच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. 
 
सांगण्यात येणा-या आख्यायिकेप्रमाणे, कार्तिक स्वामी हे सन्यस्थ वृत्तीचे होते आणि त्यामुळे महिलांना त्यांचे दर्शन घेता येत नसे. आई पार्वतीने त्यांना तुझ्या जन्मदिवसाच्या दिवशी तरी किमान महिलांना दर्शन दे, असे सांगितल्यानंतर त्यांनी ते मान्य केले. त्यामुळे वर्षभरातून एकदा महिलांना त्यांच्या मंदिरात प्रवेश दिला जातो. संस्थानच्या वतीने नाथ सष्टीला कार्तिक स्वामींची पालखी पैठणला नेली जाते. चैत्र महिन्यात शिव-सती विवाहाच्या तिथीच्या मुहूर्तावर मंदिरातही मोठा उत्सव साजरा केला जातो.  
 
कार्तिक महिन्यातील पोर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र जेव्हा एकत्र येतात, त्यावेळी कार्तिक स्वामीच्या दर्शनाचा काळ भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक स्वामी हे बल, बुध्दी आणि साहस याचे प्रतीक मानले जातात.