शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तेल्या रोगामुळे शेकडो हेक्टरातील डाळिंबाच्या बागा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : मागील एक वर्षापासून झालेल्या वातावरण बदलामुळे डाळिंबाच्या फळबागांना मोठा फटका बसला असून, तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : मागील एक वर्षापासून झालेल्या वातावरण बदलामुळे डाळिंबाच्या फळबागांना मोठा फटका बसला असून, तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो हेक्टरातील फळबागा नष्ट करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फटका बसत आहे. माजलगाव तालुक्यातही तेल्यामुळे शेतकरी जेसीबीच्या साहाय्याने फळबागा तोडू लागले आहेत.

मागील एक ते दीड वर्षापासून दमट वातावरण व इतर कारणांमुळे डाळिंब फळबागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. एक वर्षापूर्वी सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात या रोगामुळे डाळिंब फळबागाचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर मागील सहा महिन्यांत मराठवाड्यात या रोगाने नांगी टाकली. पाहता पाहता पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील हजारो हेक्टर डाळिंबाच्या फळबागा नष्ट कराव्या लागत आहेत.

------

अशी होते तेल्या रोगास सुरुवात

डाळिंबाच्या फळावर सुरुवातीस तेलकट डाग पडतो. नंतर हे फळ फुटते. त्यामुळे त्याला फेकून दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. ही बाग तशीच ठेवल्यास इतर ठिकाणच्या डाळिंबाच्या फळबागांनाही या रोगाची लागण होऊ शकते, तसेच वाऱ्याने हा रोग इतर ठिकाणी पसरतो. हा रोग अनेक डाळिंब फळबागांवर पडल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आलेली बाग मोडावी लागली. परिणामी डाळिंबाच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याने डाळिंबाला चांगलाच भाव मिळू लागला आहे.

------

या रोगावर औषध नाही

तेल्या रोग डाळिंबाच्या बागेवर पडल्याने फळबागा तोडल्याशिवाय पर्याय उरत नाही. या रोगावर अद्याप कुठल्याच प्रकारचे औषध उपलब्ध नसल्याने ही बाग तोडण्यामागचे कारण सांगितले जाते.

-------

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब बागेवर तेल्या रोग पडल्यास त्यांनी तत्काळ ही बाग तोडून नष्ट करावी. या शेतीत दुसरे पीक घ्यावे. मी शेलापुरी येथील १२ एकरातील डाळिंबाची फळबाग तेल्या रोगामुळे नष्ट केली. यामुळे मला पन्नास ते साठ लाखांचे नुकसान झाले. या रोगामुळे उत्पादन कमी झाल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. माझ्या सावरगाव व हनुमाननगर येथील डाळिंब फळबागेस चांगला भाव मिळाला आहे.

नितीन नाईकनवरे, डाळिंब उत्पादक शेतकरी, शेलापुरी

060921\purusttam karva_img-20210905-wa0023_14.jpg