शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

सत्तेसाठी ओबीसींचा वापर झाला : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

बीड : ओबीसी संख्येने अधिक आहेत, पण ते विखुरलेले आहेत. आता आरक्षण टिकविण्यासाठी एकत्रित यावे लागेल. आतापर्यंत ओबीसींचा केवळ ...

बीड : ओबीसी संख्येने अधिक आहेत, पण ते विखुरलेले आहेत. आता आरक्षण टिकविण्यासाठी एकत्रित यावे लागेल. आतापर्यंत ओबीसींचा केवळ सत्तेसाठी वापर झाल्याचा घणाघात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. ओबीसींचा सत्तेत सहभाग वाढला तरच समाजाचे प्रश्न सुटतील, असेही त्यांनी सांगितले.

येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २६ सप्टेंबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघ आयोजित जिल्हा अधिवेशन व ओबीसी, व्हीजेएनटी यांच्या आरक्षण बचाव निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. संस्थापक बबनराव तायवाडे, माजी आमदार नारायण मुंडे, शफी अन्सारी, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. पी. टी. चव्हाण, राजेसाहेब देशमुख, विष्णू देवकते, अर्जुन दळे, विष्णू देवकते, संदीप बेदरे, राजुकमार घुले, प्रकाश घुंगरड, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला. मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, अनेकजण सत्तेत येण्यासाठी ओबीसींचा आधार घेतात; पण मला आयुष्यात काही स्वत:साठी मिळवायचं नाही. मी आधी सत्तेत आहे आणि या सत्तेचा वापर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी करीत आहे. ते म्हणाले, १२७ वी घटनादुरुस्ती केली, पण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच ठेवली. त्यामुळे ओबीसींमध्ये इतरांना सामावून घेऊन आरक्षण देता येणार नाही. मंडळ आयोग हिंदूविरोधी असल्याचे सांगितले गेले व आपसात लढण्यात वेळ गेला. यातून काय साध्य झाले, वंचित, उपेक्षित घटकांतील लोकांच्या न्याय्य-हक्कांसाठी लढण्यासाठी आपण पहाड बनून उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अर्जुन दळे यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. पी. टी. चव्हाण, जे. डी. शाह यांची भाषणे झाली. बबनराव तायवाडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यात त्यांनी ओबीसींच्या न्यायासाठी केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडला. महाज्योती संस्थेमार्फत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेतील बंजारा, वासुदेव, गोसावींनी लक्ष वेधले. ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

....

वंचित समाजाला मुख्यमंत्रिपदाची संधी द्या

जे वंचित आहेत, त्यांनाच त्यांच्या वेदना माहीत आहेत. मात्र, सध्या गृहीत धरण्याचे प्रकार सुरू आहेत. तेव्हा ओबीसींना आपली ताकद दाखवावी लागेल. दिल्लीत महिनाभर तळ ठोकून बसण्याची तयारी ठेवावी लागेल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. वंचित समाजातील लोकांना मुख्यमंत्री पदाची संधी का मिळत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

....

मराठा समाजाला विरोध नाही

मराठा आरक्षणप्रश्नी आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये नुकताच मोर्चा काढला होता. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा जाहीर इशारा दिला होता. हा धागा पकडून मंत्री वडेट्टीवारांनी माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. ओबीसींच्या वाट्यातून आरक्षण घेण्याला आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीतून आरक्षणाचा कोटा वाढविण्यासाठी ओबीसी मराठा समाजासोबत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिवाय कोणी तरी येऊ देत वडेट्टीवारांना म्हटले होते, आता आलो आहे, असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

....