शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

कोरोनाच्या काळातही आत्महत्यांचा आकडा कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:36 IST

बीड : कोरोनाच्या काळात इतर जिल्ह्यांत आत्महत्येचे प्रमाण घटल्याची नोंद प्रशासनाकडे आली. मात्र, बीड जिल्ह्यातील आत्महत्येचे आकडे काही कमी ...

बीड : कोरोनाच्या काळात इतर जिल्ह्यांत आत्महत्येचे प्रमाण घटल्याची नोंद प्रशासनाकडे आली. मात्र, बीड जिल्ह्यातील आत्महत्येचे आकडे काही कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६०० आत्महत्या झाल्या आहेत. यावर्षी देखील मार्च अखेरपर्यंत जवळपास १६० आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात मागील वर्षी देखील ६९९ आत्महत्यांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झालेली आहे. आत्महत्येची विविध कारणे आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या नोंदी आहेत, तर त्याखालोखाल वैवाहिक कलहातून झालेल्या आत्महत्या आहेत. दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपायोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व एक विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेतला तर जिल्ह्यातील वाढता आत्महत्येचा आकडा कमी करण्यास मदत होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय, उद्योग बंद झाले आहेत. दरम्यान, या काळात सर्वांनी एकमेकांना आधार देत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेल्या नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे. कितीही संकट आले तरी आत्महत्या हा पर्याय नसून, खचून न जाता जोमाने पुढे जाणे महत्त्वाचे आहे.

संकट माझ्या एकट्यावर नाही...

कोरोनामुळे सर्वांवर संकट आले आहे. मी एकटाच अडचणीत नसून, अनेक मोठे उद्योग व्यवसाय व व्यापार बंद झाले आहेत. ही एक भावनादेखील आत्महत्येचे विचार आपल्या डोक्यातून काढण्यासाठी महत्त्वाची आहे. लॉकडाऊन आहे, त्यामुळे बाहेर पडता येत नाही तर कुटुंबासोबत वेळ घालवा, नवीन काही गोष्टी करता येतील का त्याचा विचार करा. तसेच असे विचार मनात येत असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोला, जेणेकरून आपल्या भावना व्यक्त होतील व विचार बदलतील. तीव्र विचार येत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मत डॉ. यशवंत राजेभोसले यांनी व्यक्त केले आहे.

अशी आहे आत्महत्येची आकडेवारी

२०१९ - ६०६

२०२० - ६९९

२०२१ -१५५