शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
5
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
6
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
7
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
8
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
9
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
10
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
11
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
12
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
13
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
14
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
15
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
16
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
17
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
18
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
19
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
20
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

आता शेतकऱ्यांना महिन्याला ५० बॅगच खत मिळणार; कृषी व्यापाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:24 IST

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाया टळणार असून, पारदर्शकता येणार आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना होता नाहक त्रास

बीड : शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदीसाठी दरमहा ५० बॅगची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाया टळणार असून, पारदर्शकता येणार आहे.

आता एका शेतकऱ्याच्या नावे फक्त ५० बॅग खत दर महिन्याला खरेदी करता येणार आहे. म्हणजे साधारण २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खत शेतकऱ्याला खरेदी करता येणार आहे. यापूर्वी खतांची खरेदी अमर्यादित केली जायची. शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर खत खरेदी व्हायचे. मात्र, दोनपेक्षा जास्त सदस्यांच्या नावावर शेती असायची. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात खत खरेदी केल्याचे दिसत होते. आता आधारकार्डनुसार एका शेतकऱ्याला केवळ ५० बॅग खताची खरेदी महिन्याला करता येणार आहे. त्यामुळे किती शेतकऱ्यांना किती खत विकण्यात आले, किती शेतकऱ्यांनी खत खरेदी केले, याची माहिती संकलित होण्यासही मदत होणार आहे.

व्यापाऱ्यांना होता नाहक त्रासमागील आठ महिन्यांपासून प्रत्येक जिल्ह्यातील टॉप बायर्सची यादी जारी होत होती. दर महिन्याला जादा खत विक्री केल्याचे पोर्टलवर दिसत असल्याने कृषी विक्रेत्यांवर कारवाया होत होत्या. त्यामुळे ॲग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनने हा प्रश्न केंद्र सरकारकडे लावून धरला. खत विक्री प्रणालीत (पीआएस मशीनमध्येच) लॉक सिस्टिम लागू करावी, प्रति शेतकरी खत मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती. ऑल इंडिया ॲग्रो इनपुट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री, महासचिव प्रवीणभाई पटेल, कोषाध्यक्ष आबासाहेब भोकरे, प्रवक्ता संजय रघुवंशी यांनी सतत पाठपुरावा केला. त्यावर विचार करून केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. रसायन व उर्वरक मंत्रालयाचे डीबीटी संचालक निरंजन लाल यांनी याबाबत २१ जानेवारीला कृषी यंत्रणेला पत्राद्वारे सूचित केले आहे.

पारदर्शकता येणारया निर्णयामुळे खतांची खरेदी - विक्री ऑन रेकॉर्डवर दिसणार आहे. त्याचबरोबर खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा अंगठा पॉस मशीनवर लावून विक्री होणार असल्याने पारदर्शकता येणार आहे. तसेच व्यापाऱ्यांवरील कारवाई टळणार आहे.

दृष्टीक्षेपात : - २ लाख टन खतांची बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात विक्री होते.- २० कृषी व्यापाऱ्यांना दरमहा कारवाईला सामोरे जावे लागत होते.- ५० बॅग महिन्याला अनुदानित खत खरेदी निश्चित केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार, तर किती शेतकऱ्यांनी किती खत खरेदी केले, हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीBeedबीडFarmerशेतकरी