शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

नरेगा गैरव्यवहारप्रकरणी १४ सरपंच, ७५ ग्रामसेवकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

धारूर : नरेगामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी धारूर तालुक्यातील दहा गावांच्या १४ सरपंचांसह ७५ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात ...

धारूर : नरेगामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी धारूर तालुक्यातील दहा गावांच्या १४ सरपंचांसह ७५ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नरेगामधील गैरव्यवहारप्रकरणी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. या प्रकरणी आता महसूल विभागाकडून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली असून बीड जिल्ह्यातील जवळजवळ ५०० सरपंच आणि ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात धारूर तालुक्यातील ७५ ग्रामसेवक व १४ सरपंचांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या नरेगाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या, यासोबतच ज्या कामाच्या ऑडिटनंतर काम नियमबाह्य झाले असल्याचे पुढे आले होते, त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक तसेच रोजगार सेवकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसीला तीन दिवसांत उत्तर मागितले आहे.

धारूर तालुक्यातील ७५ ग्रामसेवक व १४ सरपंचांना या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील कोळपिंपरी, रुइधारूर, तेलगाव, उमरेवाडी, पिंपरवाडा, सुरनरवाडी, कासारी, गांजपूर, मुंगी, चिंचपूर या गावात नरेगाची ठपका ठेवलेली कामे करण्यात आलेली आहेत. या गावांसह इतर काही गावांत संबंध असलेल्या तब्बल ७५ ग्रामसेवकांना तसेच कोळपिंपरीच्या तीन तर रुईधारूर व उमरेवाडीच्या प्रत्येकी दोन सरपंचांचा यात समावेश आहे.