शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अनंत चतुर्थीला नाही तर भाद्रपद प्रतिपदेला होते टेंबे गणपतीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 19:37 IST

नवसपूर्तीसाठी भाविक घेतात हाती पेटते टेंबे

ठळक मुद्देदर्शनासाठी राज्यासह परराज्यातून भाविक पाच दिवसीय असतो उत्सव

माजलगाव (बीड ) : ११९ वर्षाची परंपरा असलेल्या येथील टेंबे गणपतीला शनिवारी भाद्रपद प्रतिपदेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोरया-मोरयाच्या गजरात आणि पेटत्या टेंब्याच्या साक्षीने मिरवणुकीने निरोप दिला. 

निजामकालीन आख्यायिका असलेल्या येथील टेंबे गणपतीची भाद्रपद एकादशीला स्थापना होते. यानंतर आज शनिवारी सहाव्या दिवशी सायंकाळी राममंदिर येथून विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. भाविकांनी आपल्या नवसपूर्तीसाठी हाती पेटते टेंबे घेतले होते. गणपतीची सहा फुटी मूर्तीची भाविकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. यावेळी  भाविकांनी घराघरासमोर सडा-रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी गणपतीची आरती करून दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली. मिरवणूकी दरम्यान चंद्रयान व भगवान शंकराचे तांडव नृत्य असा मोहक देखावा सादर करण्यात आला. दर्शनासाठी राज्यातून व परराज्यातील भाविक मोठया प्रमाणात आले होते.

१९०१ साली निजाम राजवटीमध्ये झाली होती स्थापना 

माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणेश. या गणेशाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा स्थापनाही उशिराने होते आणि अवघ्या पाच दिवसानंतर तो विसर्जित केला जातो. पण या दरम्यानच्या काळात कुठेही गणेश विसर्जन राहिलेले नसते. त्यामुळे या गणपतीला विशेष महत्व आहे. तसेच ब्रह्मवृंदांच्या हातानेच या गणपतीची मूर्ती साध्या मातीपासूनच अगदी परंपरेने ११८ वर्षांपासून बनवली जात असल्याने त्या मूर्तीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. भट गल्लीमध्ये स्थापन होणाऱ्या व नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभर ओळख असलेल्या या टेंबे गणपतीची स्थापना भाद्रपद एकादशीला झाले.

राज्यामध्ये आगळीवेगळी ओळख असलेल्या टेंबे गणपतीची स्थापना १९०१ साली निजाम राजवटीमध्ये झाली होती. निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला टेंबे गणेशाचे आगमण होते आणि पाच दिवसांनी म्हणजे भाद्रपद पोर्णिमेला विसर्जन होते. या पाठीमागे देखील एक प्रसंग असून स्वातंत्र्यपूर्व काळात १९०१ साली निजाम राजवटीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रझाकारांची परवानगी लागत असे. गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या स्थापनेसाठी मंडळाच्या सदस्यांनी रझाकारांची परवानगी न घेता मिरवणूक काढली होती. गणपती बाप्पाच्या स्थापनेचा परवाना निझाम सरकारकडून मागितला गेला. त्यामुळे मंडळाचे तत्कालिन सदस्य कोंडोपंत जोशी, गणतप जोशी, मल्हार जोशी, राजाराम जोशी, राम जोशी, काशिनाथजोशी यांनी परवाना आणण्यासाठी वाहनांची सोय नसल्यामुळे घोड्यावरून भाग्यनगर म्हणजेच हैद्राबाद येथे गेले व तिथून ताम्रपटावर गणपती स्थापनेची परवानगी आणली.या दरम्यान गेलेल्या कालावधीमुळे या गणपतीची स्थापना उशिराने होते आणि विसर्जन देखील उशिराने होते. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवBeedबीड