शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

देयके न मिळाल्यामुळे छावणी बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:03 IST

मार्च महिन्याच्या शेवटी चारा छावण्या जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत देयके अदा न केल्यामुळे छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देछावणी चालक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : चालकांची आर्थिक कोंडी

बीड : मार्च महिन्याच्या शेवटी चारा छावण्या जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत देयके अदा न केल्यामुळे छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बुधवारपासून चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय छावणी चालक संघटनेच्या वतीने घेतला आहे. याचे जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिले.जिल्ह्यात चारा उपलब्ध नसल्यामुळे चारा छावणी चालकांना जिल्हा तसेच परराज्यातुन चारा चढ्या दराने विकत आणावा लागत आहे. यामुळे मागील वर्षापेक्षा खर्च दुप्पट वाढला आहे. परंतु शासनाचा निर्णय प्रति जनावरं ९० रुपये व लहान जनावरांसाठी ४५ रुपये देण्याचे ठरलेले असताना देखील, प्रत्येकी ७० व ३५ रुपया प्रमाणे देयके दिली जणार आहेत. त्यामध्ये देखील मुळ देयकाच्या रक्कमेत २५ टक्के कपात करुन देयके अदा केली जाणार आहेत. त्यामुळे छावणी चालकांवर हा अन्याय असल्याची भावना निर्माण झाली आहे. ८ मे रोजी चारा छावणी चालक संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन दिले होते. त्यावेळी देयके १३ मे पर्यंत मिळाली नाहीत तर १४ मे रोजी छावणी बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, देयके अदा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. म्हणून चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय मागे घेतला होता. परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. व ९ ते ११ मे या दरम्यान केलेल्या तपासणीत जनावरांची संख्या ५० पेक्षा कमी आढळून आलेल्यांना देखील भरमसाठ दंड अकारण्यात आला आहे. वास्तविक पाहता २० ते २५ बैल जोड्या कामासाठी शेतकरी आपल्या शेतात घेऊन जातात, त्यामुळे ही तफावत होती तरी देखील तपासणी अधिकाºयांनी हालचाल नोंदवहीची दखल न घेता कारवाई केल्यामुळे छावणी चालकांची पिळवणूक होत आहे. या सर्व कारणांचा विचार केला तर छावणी चालकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येते त्यामुळे बुधवारपासून चारा छावणी बंद करण्याचा निर्णय छावणी चालक संघटनेने घेतला आहे. यावेळी छावणी चालक संघटनेचे अध्यक्ष अशोक हिंगे, बबनराव गवते, प्रकाश कवटेकर, बळीराम गवते, अशोक सुखावसे, राजेंद्र मस्के, कलंदर पठाण, वैजीनाथ तांदळे, रमेश पोकळे, गणेश उगले आदींसह मोठ्या संख्येने छावणी चालक उपस्थित होते.संघटनेसोबत जिल्हाधिकाºयांची बैठकछावणी चालकांनी चारा छावणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी त्यांच्यासोबत बैठक घेऊन म्हणणे ऐकून घेतले. यामध्ये प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करीत देयके अदा केले जातील, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.बैठकीनंतर चारा छावण्या बंद न करण्याच्या निर्णयावर तोडगा निघाला असल्याचेही जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीAgriculture Sectorशेती क्षेत्र