शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

आता कोणी नाही राहणार उपाशी, केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार सवलतीत धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

बीड : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री गरीब कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला मोफत ...

बीड : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री गरीब कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. यासोबतच आता पुरवठा विभागाने प्राधान्य आणि एपीएलमध्ये लाभ न घेतलेल्या ४ लाख ६३ हजार ३७६ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना कमी किमतीमध्ये धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेमध्ये गरीब कल्याण योजना आणि शेतकरी योजनेतून सुटलेल्या कार्डधारकांचादेखील समावेश असणार आहे.

जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार ३६९ इतके केशरी कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना प्रत्येकी एक किलो गहू आणि एक किलो तांदूळ कमी किमतीत वितरित होणार आहे. हे धान्य वितरित करताना गतवर्षीच्या मे ते ऑगस्ट महिन्यात शिल्लक राहिलेल्या कोट्यामधून त्याचे वितरण होणार आहे. दरम्यान, या लाभार्थ्यांमध्ये एपीएल शेतकरी ५ लाख ४० हजार ५५७ कार्डधारकांपैकी ज्यांना लाभ मिळत नाही त्यांना देखील लाभ मिळणार आहे. हे धान्य वितरण जून महिन्याकरिता असणार आहे. दरम्यान, यासंदर्भात शासनाने आदेश जारी केले असून ज्या तालुक्यातील गोदामात धान्य शिल्लक आहे, त्याच ठिकाणी प्राधान्याने लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात या घडीला २३३ मेट्रिक टन गहू व १७३ मेट्रिक टन तांदूळ शिल्लक आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ८ रुपये प्रति एक किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ एक किलो वाटप केले जाणार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वांचेच हाल सुरू असून, सर्वांना मोफत धान्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक ९३०१९८

अंत्योदय अन्न योजना कार्डधारक ४०२८८

प्राधान्य कटुंब योजना ३४९४६९

एपीएल शेतकरी ५४०५४७

बीपीएलच्या

४०२८८

कुटुंबांना लाभ

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि शेतकरी योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना स्वस्त धान्य वितरित करण्यात येत आहे.

ही योजना राबविताना केशरी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आले होते. पहिल्या लाटेच्या वेळीस आलेले धान्य शिल्लक आहे. हे धान्य या योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

दरम्यान, ज्याठिकाणी धान्य शिल्लक असेल त्याच तालुक्यातील लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

१ किलो गहू

१ किलो तांदूळ

४ लाख ६३ हजारजणांना मिळेल लाभ

या योजनेत जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७६ लाभार्थी निवडण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांना प्रत्येकी १ किलो तांदूळ व १ किलो गहू देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गोदामात २३३ मेट्रिक टन गहू व १७३ मेट्रिक टन तांदूळ शिल्लक आहे. याच कोट्यातून हे सर्व धान्य प्राधान्याने वितरित केले जाणार आहे.

...

उपलब्ध ठिकाणीच होणार वाटप धान्य

शासन निर्णयाप्रमाणे ज्या तालुक्यातील गोदामात धान्य शिल्लक आहे, त्याठिकाणी ते प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मे ते ऑगस्ट कालावधीत कार्डधारकांचे धान्य राहिले त्यांनाचा याचा लाभ मिळणार आहे.

-मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड.

===Photopath===

280521\28_2_bed_24_28052021_14.jpg

===Caption===

धान्य वाटप करताना रेशनकार्डधारक