शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

बीड शहरातील बिंदुसरेवरील नवा पूलही धोक्याचा

By admin | Updated: June 19, 2017 00:10 IST

बीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील निजामकालिन पूल कमकुवत झाल्यामुळे पात्रातून केलेला पर्यायी पूल कोसळल्यानंतर सत्ताधारी- विरोधकात पत्रकबाजी, आरोपांच्या फैरी झडत आहेत.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील निजामकालिन पूल कमकुवत झाल्यामुळे पात्रातून केलेला पर्यायी पूल कोसळल्यानंतर सत्ताधारी- विरोधकात पत्रकबाजी, आरोपांच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे शहर व पेठ भागाला जोडणाऱ्या नव्या पुलाच्या दुर्दशेकडे मागील एक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा पूलही धोक्याचा बनला असून, दुर्घटनेची वाट पाहत बसायचे काय? असा सवाल नागरिकांतून होत आहे. गतवर्षी २ आॅक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे बिंदुसरा नदीला पूर आला होता. डॉ. आंबेडकर चौक, कंकालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग, जुना मोंढा, बालाजी मंदिर भागाला पुराचा फटका बसला. शेकडो व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. पुरात नवा पूल येथील यशवंतराव चव्हाण उद्यान (चमन) वाहून गेले. परिसरातील पुतळे राहिले मात्र झाडे उन्मळून पडली, तर नव्या पुलाचे सिमेंटचे कठडे तुटून वाहून गेले. चमनलगतचा भाग उघड्यावर पडल्याने वाहतुकीसाठी धोका असल्याचे स्पष्ट दिसत असताना कोणीही या बाबीकडे लक्ष दिले नाही. पूर ओसरल्यानंतर शहराच्या विकासाचा डांगोरा पिटणाऱ्यांसह साऱ्यांनीच मौन बाळगले. आता नऊ महिन्यानंतर पावसाळा सुरू होताच पुन्हा या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आहे. बिंदुसरेवरेच्या मोठ्या पुलावरील कामाबाबत प्रशासन कार्यवाही करील परंतू नव्या पुलाच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय होईपर्यंत किमान पावसाळा कालावधीत सुरक्षेच्या दृष्टीने नगर पालिकेने व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.