शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
3
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
4
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
5
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
6
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
7
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
8
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
9
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
10
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
11
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
12
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
13
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
14
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
15
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
16
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
17
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
18
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
19
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
20
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक स्वास्थ्यासाठी विधवा पुनर्विवाहाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:34 IST

बीड : गुरुनिष्ठ संत, पंढरीचे निस्सीम वारकरी श्री संत खंडोजीबाबा यांच्या चरणांजवळ आलात की देव भेटेल, असे प्रतिपादन ह. ...

बीड : गुरुनिष्ठ संत, पंढरीचे निस्सीम वारकरी श्री संत खंडोजीबाबा यांच्या चरणांजवळ आलात की देव भेटेल, असे प्रतिपादन ह. भ. प. प्रा. नाना महाराज कदम यांनी केले. श्रीक्षेत्र लोणी वारणी येथे संत खंडोजी बाबा पुण्यतिथी सोहळ्यात चौथे कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी महंत यादव बाबा, अभिमान महाराज ढाकणे, संजय महाराज देवकर, प्रा. सुरेश महाराज जाधव, योगेश महाराज जोगदंड, खंडोजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कदम महाराज म्हणाले, संत बंकट स्वामी महाराज यांचे शिष्य संत वामन भाऊ, संत भगवान बाबा यांनी महाराष्ट्रात प्रचार-प्रसाराचे खूप मोठे काम करीत जनसामान्यांपर्यंत वारकरी संप्रदाय नेला. वैराग्याच्या जोरावरच देवत्व आपलेसे करण्याचे सामर्थ्य संतांमध्ये असते. खरा परमार्थ करताना आजच्या आधुनिक युगामध्ये संतांचे विचार जीवनामध्ये अंगिकारणे महत्त्वाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाने सर्वप्रथम विधवा महिलांनाही सांप्रदायात महत्त्वाचे स्थान दिले. सद्य:स्थितीत लोकांनी तरुण वयामध्ये अकाली वैधव्य आलेल्या महिलांचे पुनर्विवाह करण्याचा विचारही करावा. सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी विधवा विवाहाची संकल्पना पुन्हा एकदा समाजामध्ये रूढ होणे गरजेचे असल्याचे नाना महाराज म्हणाले. या कीर्तनात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. खंडोजी बाबा गडावरील टाळकरी, गायक-वादक सर्वांची साथसंगत लागल्याने कीर्तनात रंगत आली.