शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

राष्ट्रवादीचा १५ तर शिवसेनेचा २१ ग्रामपंचायतीवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:35 IST

बीड : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या ताब्यात ग्रामपंचायती आल्याचा दावा केला जात ...

बीड : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या ताब्यात ग्रामपंचायती आल्याचा दावा केला जात आहे.निवडणूक २९ ग्रामपंचायतींची झालेली असताना राष्ट्रवादीने १५ तर शिवसेनेने २१ ग्रामपंचायतींवर दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

तालुक्यात निवडणूक झालेल्या २४ पैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून ३ ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात १५ ग्रामपंचायती आल्याचा दावा करण्यात आला आहे. काटवटवाडी, मौज/ब्रह्मगाव, मौजवाडी या तीन ग्रामपंचायती रा.काँ.च्या बिनविरोध ताब्यात आलेल्या आहेत. तर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बहिरवाडी, आनंदवाडी, पिंपळगाव मोची, कळसंबर, कारळवाडी/निर्मळवाडी, पिंपळगाव मंझरा, नागझरी/मान्याचावाडा, गुंधा, भंडारवाडी, गुंधावाडी, नागापुर (बु.), कदमवाडी या ग्रामपंचायती आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनेचा दावा

तालुक्यातील २९ पैकी २१ ग्रामपंचायतीवर भगवा डौलाने फडकला. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, जिल्हा संघटक नितीन धांडे, महिला आघाडीच्या संगिता चव्हाण तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली २१ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे. बीड तालुक्यात मौज, ब्रम्हगाव, मौजवाडी, मैंदा पोखरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, कारळवाडी, निर्मळवाडी, कर्जणी, कोळवाडी, गुंधा, जिरेवाडी, पिंपळगाव घाट, वासनवाडी, वंजारवाडी, गुंदावाडी, वायभटवाडी, बाळसापूर, बेलखंडी पाटोदा, वरवटी, आहेरधानोरा, मानेवाडी, भंडारवाडी या २१ ग्रामपंचायतीवर भगवा फडकल्याचा दावा करण्यात आला आहे. विजयी उमेदवारांचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर सत्कार केला.

शिवसंग्रामचा ही शिरकाव

या निवडणुकीमध्ये आ. विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये शिवसंग्रामचा शिरकाव झाला आहे. बीड तालुक्यातील कर्झनी, पिंपळगाव घाट, वरवटी धानोरा, पालवन, मानेवाडी ,बेलखंडी पाटोदा तसेच शिरूर तालुक्यातील येवलवाडी वंजारवाडी, टाकळवाडी धनगरवाडी खरगवाडी, हटकरवाडी आवळवाडी व गेवराई तालुक्यतील भडंगवाडी,गंगावाडी या ग्रामपंचायतींमध्ये शिवसंग्राम समर्थक उमेदवारांनी विजय मिळविल्याचे शिवसंग्रामकडून सांगण्यात आले. विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.