शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:09 IST

भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने शेतक-यांची क्रूरचेष्टा केल्यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांमध्ये सरकारविषयी असंतोष आणि संताप आहे. कर्जमाफी, लोडशेडींग, हमीभाव, बोंडअळीचा प्रादुर्भाव, थकित पीक विमा यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरूवारी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देभाजप सरकारवर अमरसिंह पंडितांची कडाडून टीका

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने शेतक-यांची क्रूरचेष्टा केल्यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांमध्ये सरकारविषयी असंतोष आणि संताप आहे. कर्जमाफी, लोडशेडींग, हमीभाव, बोंडअळीचा प्रादुर्भाव, थकित पीक विमा यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरूवारी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी व कार्यकर्ते यांनी सरकारविरूद्ध घोषणा दिल्या.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, माळी गल्ली, मोमीनपुरा, भवानी पेठ, चिंतेश्वर गल्लीसह विविध मार्गावरून निघून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांनी केले. प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या गावातून हजारो युवक मोटारसायकल रॅलीने मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी भाऊसाहेब नाटकर, जालिंदर पिसाळ, पाटीलबा मस्के, ऋषीकेश बेदरे, समाधान मस्के, आनंद सुतार, जगन पाटील काळे, डिगांबर येवले, जगन्नाथ शिंदे, शाम मुळे, फुलचंद बोरकर, महंमद गौस, दत्ता पिसाळ, अर्जुन चाळक, बब्बू बारुदवाले, गुफरान इनामदार, शेख मन्सूर, नवीद मशायक, सय्यद नजीब, इर्शाद फारोकी, हन्नान, अब्दुल, जीजा पंडित, रामनाथ दाभाडे, विलास ठाकूर, वसीम फारोकी, शाम पाटील, सुंदर काळे, संग्राम आहेर, डॉ. विजयकुमार घाडगे, बाबासाहेब आठवले, डॉ. आसाराम मराठे, भरत खरात, साहेबराव पांढरे, नवनाथ वेताळ, राजेंद्र वारंगे, प्रभाकर ससाणे, मोतीराम गाडे, जयसिंह जाधव, लक्ष्मण देवकर, परमेश्वर खरात, तय्यब यांच्यासह राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा आहेत मागण्यासंपूर्ण कर्जमाफी, लोडशेडींग, हमीभाव बोंड अळीचा प्रार्दुभाव, थकित पीक विमा, दरोड्यांचा तपास, नादुरुस्त रोहित्र, कापसाला ५०० रु . प्रती क्विंटल बोनस, थकित नुकसान भरपाई, प्रलंबित भूसंपादन मावेजा आदी मागण्यांसाठी हा मोर्चाकाढण्यात आला.