शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:09 IST

भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने शेतक-यांची क्रूरचेष्टा केल्यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांमध्ये सरकारविषयी असंतोष आणि संताप आहे. कर्जमाफी, लोडशेडींग, हमीभाव, बोंडअळीचा प्रादुर्भाव, थकित पीक विमा यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरूवारी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देभाजप सरकारवर अमरसिंह पंडितांची कडाडून टीका

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने शेतक-यांची क्रूरचेष्टा केल्यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांमध्ये सरकारविषयी असंतोष आणि संताप आहे. कर्जमाफी, लोडशेडींग, हमीभाव, बोंडअळीचा प्रादुर्भाव, थकित पीक विमा यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरूवारी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी व कार्यकर्ते यांनी सरकारविरूद्ध घोषणा दिल्या.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, माळी गल्ली, मोमीनपुरा, भवानी पेठ, चिंतेश्वर गल्लीसह विविध मार्गावरून निघून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित यांनी केले. प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या गावातून हजारो युवक मोटारसायकल रॅलीने मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी भाऊसाहेब नाटकर, जालिंदर पिसाळ, पाटीलबा मस्के, ऋषीकेश बेदरे, समाधान मस्के, आनंद सुतार, जगन पाटील काळे, डिगांबर येवले, जगन्नाथ शिंदे, शाम मुळे, फुलचंद बोरकर, महंमद गौस, दत्ता पिसाळ, अर्जुन चाळक, बब्बू बारुदवाले, गुफरान इनामदार, शेख मन्सूर, नवीद मशायक, सय्यद नजीब, इर्शाद फारोकी, हन्नान, अब्दुल, जीजा पंडित, रामनाथ दाभाडे, विलास ठाकूर, वसीम फारोकी, शाम पाटील, सुंदर काळे, संग्राम आहेर, डॉ. विजयकुमार घाडगे, बाबासाहेब आठवले, डॉ. आसाराम मराठे, भरत खरात, साहेबराव पांढरे, नवनाथ वेताळ, राजेंद्र वारंगे, प्रभाकर ससाणे, मोतीराम गाडे, जयसिंह जाधव, लक्ष्मण देवकर, परमेश्वर खरात, तय्यब यांच्यासह राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा आहेत मागण्यासंपूर्ण कर्जमाफी, लोडशेडींग, हमीभाव बोंड अळीचा प्रार्दुभाव, थकित पीक विमा, दरोड्यांचा तपास, नादुरुस्त रोहित्र, कापसाला ५०० रु . प्रती क्विंटल बोनस, थकित नुकसान भरपाई, प्रलंबित भूसंपादन मावेजा आदी मागण्यांसाठी हा मोर्चाकाढण्यात आला.