शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत; आडसकरांचा विजय निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:53 IST

फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ठळक मुद्देशिवाजी रांजवण यांची मुलाखत : महाराष्ट्रात मोदींची लाट अद्यापही कायम; शेतकरी भाजपवर खूष; सर्वच जण लागले प्रचारात कामाला

पुरुषोत्तम करवा।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मोहन जगताप व त्यांचे कार्यकर्ते मागील आठ दिवसांपासून आडसकरांच्या कामाला जोमाने लागले आहेत. महाराष्ट्रात मोदींची लाट अद्यापही कायम आहे. फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझे वडील सोनाजीराव रांजवण, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील , दादासाहेब रांजवण व इतर काही जणांना हा साखर कारखाना उभा करायचा होता व त्या दृष्टीने त्यांनी प्रक्रि या सुरू केली होती. त्यात आमचे वडील हे संस्थापक अध्यक्ष होते. परंतु सुंदरराव सोळंकेसाहेब हे निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांच्याकडे काहीतरी पद असावे म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना कारखान्याचे चेअरमन केले. त्यावेळी माझ्या वडीलांनी मोठ्या प्रमाणात शेअर गोळा करून कारखाना उभारणीसाठी योगदान दिलेले आहे.रमेश आडसकर हे सक्षम आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात सिद्ध होऊ शकतात. तसेच रमेश आडसकरांनी एमआयडीसीमध्ये तात्काळ उद्योग आणल्यास युवकांना नोकरीची संधी मिळू शकते, रुग्णांची संख्या पाहता उपजिल्हा रूग्णालय हे तात्काळ होणे आवश्यक आहे व ते तात्काळ हे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे. एव्हाना आमची मागणी देखील तशीच आहे. माजलगाव तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या संधीचा नक्कीच आडसकर हे सोनं करून दाखवतील, असा आम्हाला विश्वास आहे.वडील सोनाजीराव रांजवण यांना वैद्यकीय अधिकाºयाची नोकरी सोडून राजकारणात आणल्यानंतर सुरु वातीला सुंदरराव सोळंके यांचे विश्वासू म्हणून त्यांनी चांगले काम केले परंतु त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला त्यावेळी देखील विरोध केला म्हणून ते अध्यक्ष व उपाध्यक्ष असताना तब्बल १५ ते २० वेळा सोनाजीराव यांच्यावर अविश्वास आणण्यात आला. मात्र वडिलांनी आपल्या मुत्सद्दीपणाचे दर्शन घडवत प्रत्येक वेळा आलेला अविश्वास परत लावला परंतु असे असतानाही प्रकाश सोळंके हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आम्ही त्यांची साथ सोडली नाही मात्र आता आम्हाला टाळण्याचा ‘कळस’ झाल्याने आम्हाला आमची नवीन वाट शोधावी लागली, असे तेम्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांव