शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत; आडसकरांचा विजय निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:53 IST

फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ठळक मुद्देशिवाजी रांजवण यांची मुलाखत : महाराष्ट्रात मोदींची लाट अद्यापही कायम; शेतकरी भाजपवर खूष; सर्वच जण लागले प्रचारात कामाला

पुरुषोत्तम करवा।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मोहन जगताप व त्यांचे कार्यकर्ते मागील आठ दिवसांपासून आडसकरांच्या कामाला जोमाने लागले आहेत. महाराष्ट्रात मोदींची लाट अद्यापही कायम आहे. फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना खूप काही दिले आहे. सध्या सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झालेली दिसत असल्याने आडसकर यांचा विजय निश्चितच होणार आहे. त्यात आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत, असे शिवाजी रांजवण यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझे वडील सोनाजीराव रांजवण, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील , दादासाहेब रांजवण व इतर काही जणांना हा साखर कारखाना उभा करायचा होता व त्या दृष्टीने त्यांनी प्रक्रि या सुरू केली होती. त्यात आमचे वडील हे संस्थापक अध्यक्ष होते. परंतु सुंदरराव सोळंकेसाहेब हे निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांच्याकडे काहीतरी पद असावे म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना कारखान्याचे चेअरमन केले. त्यावेळी माझ्या वडीलांनी मोठ्या प्रमाणात शेअर गोळा करून कारखाना उभारणीसाठी योगदान दिलेले आहे.रमेश आडसकर हे सक्षम आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात सिद्ध होऊ शकतात. तसेच रमेश आडसकरांनी एमआयडीसीमध्ये तात्काळ उद्योग आणल्यास युवकांना नोकरीची संधी मिळू शकते, रुग्णांची संख्या पाहता उपजिल्हा रूग्णालय हे तात्काळ होणे आवश्यक आहे व ते तात्काळ हे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे. एव्हाना आमची मागणी देखील तशीच आहे. माजलगाव तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या संधीचा नक्कीच आडसकर हे सोनं करून दाखवतील, असा आम्हाला विश्वास आहे.वडील सोनाजीराव रांजवण यांना वैद्यकीय अधिकाºयाची नोकरी सोडून राजकारणात आणल्यानंतर सुरु वातीला सुंदरराव सोळंके यांचे विश्वासू म्हणून त्यांनी चांगले काम केले परंतु त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला त्यावेळी देखील विरोध केला म्हणून ते अध्यक्ष व उपाध्यक्ष असताना तब्बल १५ ते २० वेळा सोनाजीराव यांच्यावर अविश्वास आणण्यात आला. मात्र वडिलांनी आपल्या मुत्सद्दीपणाचे दर्शन घडवत प्रत्येक वेळा आलेला अविश्वास परत लावला परंतु असे असतानाही प्रकाश सोळंके हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आम्ही त्यांची साथ सोडली नाही मात्र आता आम्हाला टाळण्याचा ‘कळस’ झाल्याने आम्हाला आमची नवीन वाट शोधावी लागली, असे तेम्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांव