शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

बांधाच्या वादातून १५ वर्षांच्या मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

गेवराई : बांधाच्या वादातून १५ वर्षीय मुलाचा खून करून प्रेत उसाच्या शेतात फेकले. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि. ७) ...

गेवराई : बांधाच्या वादातून १५ वर्षीय मुलाचा खून करून प्रेत उसाच्या शेतात फेकले. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि. ७) घडली. या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी पाचजणांवर खुनाचा गुन्हा नोंंद झाला असून, मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

संदीप सोपान चव्हाण (वय १५, रा. भेंडटाकळी तांडा, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. सोपान चव्हाण व किशोर लोंढे यांचे शेजारी शेत आहे. त्यांच्यात बांधावरून सतत वाद सुरू होते. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शेतातून संदीप चव्हाण हा बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला तेव्हा तो शेजारील किशोर लोंढे याच्या शेतात मृतावस्थेत आढळला. सहायक निरीक्षक प्रताप नवघरे व सहकाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, संदीपच्या कुटुंबीयांनी त्याची शेजाऱ्यांनी बांधाच्या वादातून हत्या करून प्रेत फेकून दिल्याची तक्रार दिली. त्यावरून ९ ऑगस्ट रोजी रात्री तलवाडा ठाण्यात किशोर विठ्ठल लोंढे, भगवान विठ्ठल लोंढे, बाळू बळिराम लोंढे, सोमनाथ भगवान लोंढे, आकाश भगवान लाेंढे (सर्व रा. भेंडटाकळी) यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. उपनिरीक्षक सुभाष माने तपास करीत आहेत.

....

शवविच्छेदन अहवालात विजेच्या धक्क्याचे कारण

दरम्यान, मृत संदीप चव्हाणच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे नमूद केले आहे. त्याचा खून कसा केला, याचा उल्लेखही तक्रारीत नमूद नाही. त्यामुळे नेमके काय घडले, हे तपासात समोर येईल, असे उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी सांगितले.

....

तीन दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर विठ्ठल लोंढे यास १० ऑगस्ट रोजी तलवाडा पोलिसांनी अटक केली. किशोरला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

......