शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

मुंडे भगिनींच्या मौनामागे नाराजीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

सतीश जोशी बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देऊन लागोपाठ तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपाने धक्काच दिला नाही तर औरंगाबादच्या ...

सतीश जोशी

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देऊन लागोपाठ तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपाने धक्काच दिला नाही तर औरंगाबादच्या डॉ.भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. या एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांमुळे पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींची नाराजी या राजकीय मौनातून उघडउघड दिसत आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते म्हणून सर्वश्रूत होते. त्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजा मुंडे यांनी ओबीसी नेतृत्वाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. २०१४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आली. ‘जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री,’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी जगजाहीर केली. हीच नाराजी त्यांच्या राजकीय प्रवासात आज आड येत आहे. त्यांचे हे नाराजीचे सूर नंतर अनेक कार्यक्रमात पाहावयास मिळाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गोपीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी जो फडणवीसांवर हल्ला चढवला होता, तो निश्चितच भाजपाला रुचला नाही. हा प्रकार पक्ष शिस्तीला धरून नव्हता, तर त्यास बंडखोरीची झालर होती. पंकजा मुंडेंनी गडावर बोलावून खडसेंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. हा झाला इतिहास.

२०१९ च्या पराभवानंतरही पंकजा यांनी जुळवून घेतले नाही तर प्रत्येकवेळी फडणवीसांना निशाणा साधून टीकाच केली. फडणवीसांच्या बीड दौऱ्यात मुंडे भगिनींचे रुसवे फुगवे पाहावयास मिळाले. या सर्व गोष्टींची नोंद पक्षश्रेष्ठी घेत होती आणि त्याचा परिपाक म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात मुंडेंना स्थान मिळाले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूूमीवर मुंडेंनी फक्त ‘आम्ही मुंबईतच आहोत,’ असे एकच ट्वीट केले होते. त्यानंतर मात्र त्या माध्यमांशी काहीही बोलल्या नाहीत. इकडे त्यांच्या समर्थकांनी मात्र समाज माध्यमांवर मात्र आपला संताप व्यक्त केला आहे. मुंडे भगिनींचे ‘सोशल मीडिया नेटवर्क’ तगडे आहे. संदेश देण्या-घेण्याचे काम या नेटवर्कवरून होते. हे संदेश अनेकवेळा पक्षासाठीही असतात. पंकजा मुंडे ह्या लोकनेत्या आहेत. ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत. राज्यात कुठेही जाऊन त्या गर्दी जमा करू शकतात. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी स्टार प्रचारक म्हणून उत्तम कामगिरी बजाववली होती. कुणी कितीही प्रयत्न केला तरी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला कुणी पर्याय निर्माण होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे.