शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

बीड जिल्ह्यात महावितरणकडे विजेच्या साहित्याचा तुटवडा; वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षांने उद्भवली परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:15 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे.

बीड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने फिल्डवर असणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना ग्राहकांना तोंड देताना नाकीनऊ आल्याचे दिसते. 

ग्रामीण भागातील विद्यूत खांब व तारा जीर्ण झालेल्या आहेत. या तारांची आणि खांबाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्तीच झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. सहायक व कनिष्ठ अभियंत्यांकडून वरिष्ठांकडे वारंवार साहित्याची मागणी केली जाते, परंतु त्यांच्याकडून याकडे विविध कारणे सांगून बगल दिली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या दुर्लक्षामुळे वीज  पुरवठा विस्कळीत होत असून रात्ररात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे.

एकीकडे वीज बील वसूलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जातो. कारवाईची भाषा केली जाते, परंतु याच ग्राहकांना महावितरणकडून सुरळीत सेवा दिली जात नाही. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

ढेपाळलेला कारभार सुरळीत करादरम्यान, फिल्डवर काम करणारे, सहाकय अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. या अधिकार्‍यांनी वरिष्ठांकडे जाण्याचा सल्ला दिल्यावर वरिष्ठ त्यांना धारेवर धरतात. तर साहित्य उपलब्ध नाही, असे ग्राहकांना सांगितले, तर त्यांना हे कारणे सांगतात असे वाटते. आणि यातून त्यांच्यात वाद होतो. अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. दिवसेंदिवस महावितरणचा कारभार ढेपाळत चालला आहे. यावर तात्काळ कारवाई करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण