शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अकरा गावांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे धरणात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:21 IST

शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी  माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून  आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

- पुरुषोत्तम करवा माजलगाव(बीड), दि. 23 : शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी  माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून  आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

माजलगाव धरणाचा पाया ज्या ११ गावाचा मालमत्ते वर उभा आहे आज त्याच पुनर्वसित गावच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. माजलगाव नगर परिषद व ११ गावच्या ग्राम पंचायत यांच्यात पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चावरून वाद सुरु आहेत. यामुळे मागील 20 दिवसांपासुन या गावांचा पाणीपुरवठा नगर परिषदेने बंद  केला आहे. पाणीपुरवठा सुरूळीत करा या मागणीसाठी रेणापुरी, शेलापुरी, ब्रह्मगाव, चिंचगव्हान, काडीवडगाव,नागझरी, नांदुर खानापुर, या सह ११ पुनर्वसत गावांनी 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग 222 वर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जलसमाधी घेण्याचा प्रशासनास इशारा दिला होता. पंरतु अद्याप प्रशासन व न.प.पाणीपुरवठा सुरुळीत न करुन आंदोलनाकडे  साफ दुर्लक्ष केले.

यामुळे या गावचे ग्रामस्थ मुक्तीराम आबुज,गणेश मारगुडे, शिवाजी आबुज, विनोद आबुज,पंडीत आबुज,पांडुरंग आबुज, पवण मुळे, विकास कांबळे, आनिल कांबळे, गोविंद चांभारे, गोरख आबुज, सचिन आबुज, सोमेश्वर आबुज, धनंजय आबुज यांनी माजलगाव धरणात उतरून  न.प.व प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास  आंदोलनकर्त्यानी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस प्रशासन व गटविकास आधिकारी चव्हाण यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्याना समजावून  सांगत धरणातुन बाहेर काढून तहसील कार्यालयात चर्चेसाठी आणले आहे.