शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

अकरा गावांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे धरणात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:21 IST

शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी  माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून  आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

- पुरुषोत्तम करवा माजलगाव(बीड), दि. 23 : शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी  माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून  आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

माजलगाव धरणाचा पाया ज्या ११ गावाचा मालमत्ते वर उभा आहे आज त्याच पुनर्वसित गावच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. माजलगाव नगर परिषद व ११ गावच्या ग्राम पंचायत यांच्यात पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चावरून वाद सुरु आहेत. यामुळे मागील 20 दिवसांपासुन या गावांचा पाणीपुरवठा नगर परिषदेने बंद  केला आहे. पाणीपुरवठा सुरूळीत करा या मागणीसाठी रेणापुरी, शेलापुरी, ब्रह्मगाव, चिंचगव्हान, काडीवडगाव,नागझरी, नांदुर खानापुर, या सह ११ पुनर्वसत गावांनी 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग 222 वर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जलसमाधी घेण्याचा प्रशासनास इशारा दिला होता. पंरतु अद्याप प्रशासन व न.प.पाणीपुरवठा सुरुळीत न करुन आंदोलनाकडे  साफ दुर्लक्ष केले.

यामुळे या गावचे ग्रामस्थ मुक्तीराम आबुज,गणेश मारगुडे, शिवाजी आबुज, विनोद आबुज,पंडीत आबुज,पांडुरंग आबुज, पवण मुळे, विकास कांबळे, आनिल कांबळे, गोविंद चांभारे, गोरख आबुज, सचिन आबुज, सोमेश्वर आबुज, धनंजय आबुज यांनी माजलगाव धरणात उतरून  न.प.व प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास  आंदोलनकर्त्यानी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस प्रशासन व गटविकास आधिकारी चव्हाण यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्याना समजावून  सांगत धरणातुन बाहेर काढून तहसील कार्यालयात चर्चेसाठी आणले आहे.