शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अकरा गावांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे धरणात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:21 IST

शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी  माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून  आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

- पुरुषोत्तम करवा माजलगाव(बीड), दि. 23 : शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित ११ गावाचा पाणीपुरवठा माजलगाव नगर परिषदेने बंद केला आहे. याचा निषेध करत ११ गावचा ग्रामस्थांनी आज सकाळी  माजलगाव धरणाच्या पाण्यात उतरून  आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

माजलगाव धरणाचा पाया ज्या ११ गावाचा मालमत्ते वर उभा आहे आज त्याच पुनर्वसित गावच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. माजलगाव नगर परिषद व ११ गावच्या ग्राम पंचायत यांच्यात पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल खर्चावरून वाद सुरु आहेत. यामुळे मागील 20 दिवसांपासुन या गावांचा पाणीपुरवठा नगर परिषदेने बंद  केला आहे. पाणीपुरवठा सुरूळीत करा या मागणीसाठी रेणापुरी, शेलापुरी, ब्रह्मगाव, चिंचगव्हान, काडीवडगाव,नागझरी, नांदुर खानापुर, या सह ११ पुनर्वसत गावांनी 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग 222 वर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जलसमाधी घेण्याचा प्रशासनास इशारा दिला होता. पंरतु अद्याप प्रशासन व न.प.पाणीपुरवठा सुरुळीत न करुन आंदोलनाकडे  साफ दुर्लक्ष केले.

यामुळे या गावचे ग्रामस्थ मुक्तीराम आबुज,गणेश मारगुडे, शिवाजी आबुज, विनोद आबुज,पंडीत आबुज,पांडुरंग आबुज, पवण मुळे, विकास कांबळे, आनिल कांबळे, गोविंद चांभारे, गोरख आबुज, सचिन आबुज, सोमेश्वर आबुज, धनंजय आबुज यांनी माजलगाव धरणात उतरून  न.प.व प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास  आंदोलनकर्त्यानी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस प्रशासन व गटविकास आधिकारी चव्हाण यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्याना समजावून  सांगत धरणातुन बाहेर काढून तहसील कार्यालयात चर्चेसाठी आणले आहे.