शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

व्यापाऱ्यांचे पाण्यात बसून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

माजलगाव : शहरात निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामामुळे व्यापाऱ्यांना पावसाळा येताच मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन दिवसांपासून ...

माजलगाव : शहरात निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामामुळे व्यापाऱ्यांना पावसाळा येताच मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यावर तलावाचे स्वरूप आले होते तर अनेक दुकानदारांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असताना कोणीच लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांनी भर पावसात पाण्यात बसून आंदोलन केले.

माजलगाव शहरातील खामगाव-पंढरपूर या सिमेंट रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. हे काम सुरू असतानाच अनेक संघटनांनी हे काम निकृष्ट होत असल्याचा आवाज उठवला होता. संबंधित गुत्तेदाराने रस्त्यावरचे पाणी व्यवस्थित न काढून दिल्याने व केलेल्या नाल्या एकमेकाला न जोडल्याने जागोजागी पाणी साचत असल्याने अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी जाते. तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावरील नरवडे कॉम्प्लेक्स भागात अनेक दुकानात मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी दिसत होते. संभाजी चौकात साचलेले पाणी जाण्यासाठी नालीच नसल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.

मुख्य रस्त्यावरील हे पाणी अनेक दुकानांत गेल्याने दुकानदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज फडके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी तीन वाजता मुख्य रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामध्ये बसून आंदोलन केले. यावेळी रवी गायकवाड, सतीश थोरात, अशोक कुलते, अमर बजाज व अमोल कामठे आदी नागरिक बसले होते.

070921\purusttam karva_img-20210907-wa0070_14.jpg