शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

व्यापाऱ्यांचे पाण्यात बसून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:40 IST

माजलगाव : शहरात निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामामुळे व्यापाऱ्यांना पावसाळा येताच मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन दिवसांपासून ...

माजलगाव : शहरात निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामामुळे व्यापाऱ्यांना पावसाळा येताच मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यावर तलावाचे स्वरूप आले होते तर अनेक दुकानदारांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असताना कोणीच लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांनी भर पावसात पाण्यात बसून आंदोलन केले.

माजलगाव शहरातील खामगाव-पंढरपूर या सिमेंट रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. हे काम सुरू असतानाच अनेक संघटनांनी हे काम निकृष्ट होत असल्याचा आवाज उठवला होता. संबंधित गुत्तेदाराने रस्त्यावरचे पाणी व्यवस्थित न काढून दिल्याने व केलेल्या नाल्या एकमेकाला न जोडल्याने जागोजागी पाणी साचत असल्याने अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी जाते. तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावरील नरवडे कॉम्प्लेक्स भागात अनेक दुकानात मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी दिसत होते. संभाजी चौकात साचलेले पाणी जाण्यासाठी नालीच नसल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.

मुख्य रस्त्यावरील हे पाणी अनेक दुकानांत गेल्याने दुकानदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज फडके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी तीन वाजता मुख्य रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामध्ये बसून आंदोलन केले. यावेळी रवी गायकवाड, सतीश थोरात, अशोक कुलते, अमर बजाज व अमोल कामठे आदी नागरिक बसले होते.

070921\purusttam karva_img-20210907-wa0070_14.jpg