शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आंदोलन; ६० किलोमीटर पदयात्रा काढून शेतकऱ्यांचा 'आक्रोश'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

बीड : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी ...

बीड : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. त्यासाठी ६० किलोमीटर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. वडवणी तालुक्यातून निघालेली ही पदयात्रा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले.

अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी खचला आहे. त्यांना धीर देण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, गतवर्षीचा थकीत खरीप पीकविमा तत्काळ वाटप करावा, ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यांना ऑगस्ट २०१९ शासन अध्यादेशाप्रमाणे भरीव नुकसानभरपाई द्यावी, चालू वर्षीच्या पीकविमा योजनेतून २५ टक्के अग्रीम रक्कम तत्काळ वाटप करून १०० टक्के पीक विमा मंजूर करावा, विमा कंपनीकडून लादलेल्या जाचक अटी रद्द करून सरसकट भरपाई देण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री मुंडे यांना देण्यात आले. यावेळी अतुल झाटे, लहू गायकवाड, मुन्ना गोंडे, रामनाथ महाडिक, कैलास थोटे, महादेव गोंडे, माऊली आगे, उद्धव साबळे, परमेश्वर वीर आदी उपस्थित होते. १५ दिवसात प्रश्न निकाली निघाला नाही तर, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा करपे यांनी दिला आहे.

शासकीय पंचनाम्यानुसार मिळणार पीकविमा - मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मांडलेली अडचण सरकारला देखील ती सोडवायची आहे. येत्या १५ दिवसात ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांना शासकीय पंचनाम्यानुसार विमा रक्कम मिळेल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची घोषणादेखील लवकरच होईल, असेही ते म्हणाले.

170921\17_2_bed_23_17092021_14.jpg

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी मोर्चाला संबोधीत करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे व इतर