शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

आंदोलन; ६० किलोमीटर पदयात्रा काढून शेतकऱ्यांचा 'आक्रोश'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

बीड : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी ...

बीड : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. त्यासाठी ६० किलोमीटर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. वडवणी तालुक्यातून निघालेली ही पदयात्रा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले.

अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी खचला आहे. त्यांना धीर देण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, गतवर्षीचा थकीत खरीप पीकविमा तत्काळ वाटप करावा, ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यांना ऑगस्ट २०१९ शासन अध्यादेशाप्रमाणे भरीव नुकसानभरपाई द्यावी, चालू वर्षीच्या पीकविमा योजनेतून २५ टक्के अग्रीम रक्कम तत्काळ वाटप करून १०० टक्के पीक विमा मंजूर करावा, विमा कंपनीकडून लादलेल्या जाचक अटी रद्द करून सरसकट भरपाई देण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री मुंडे यांना देण्यात आले. यावेळी अतुल झाटे, लहू गायकवाड, मुन्ना गोंडे, रामनाथ महाडिक, कैलास थोटे, महादेव गोंडे, माऊली आगे, उद्धव साबळे, परमेश्वर वीर आदी उपस्थित होते. १५ दिवसात प्रश्न निकाली निघाला नाही तर, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा करपे यांनी दिला आहे.

शासकीय पंचनाम्यानुसार मिळणार पीकविमा - मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मांडलेली अडचण सरकारला देखील ती सोडवायची आहे. येत्या १५ दिवसात ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांना शासकीय पंचनाम्यानुसार विमा रक्कम मिळेल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची घोषणादेखील लवकरच होईल, असेही ते म्हणाले.

170921\17_2_bed_23_17092021_14.jpg

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी मोर्चाला संबोधीत करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे व इतर