शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

अपेक्षेपेक्षा जादा पाऊस, पण पिके कोमात, धरणे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

बीड : तब्बल महिनाभरापासून इंद्रदेव रुसल्याने खरिपाची पिके तर काही ठिकाणी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जून ते ...

बीड : तब्बल महिनाभरापासून इंद्रदेव रुसल्याने खरिपाची पिके तर काही ठिकाणी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जून ते १७ ऑगस्ट दरम्यान अपेक्षित साधारण पावसाच्या तुलनेत जादा पाऊस झाला आहे. तरीही धरणांमध्ये पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंतच आहे. तर खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे; मात्र पावसाअभावी सोयाबीनसह इतर पिकेही सुकण्याच्या परिस्थितीत आहेत. काही ठिकाणी तर पिके पिवळी पडून कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बीड खरिपाचे सर्वधारण क्षेत्र ७ लाख ४६ हजार ४८ हेक्टर असून, ७ लाख ४० हजार ७७१ हेक्टरात यंदा पेरा झाला आहे. हे प्रमाण ९९.२९ टक्के इतके आहे. जूनमध्ये दमदार हजेरी लावणारा पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गायब झाल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ३ लाख ५७ हजार ५५३ असून, ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ९० हजार ७४८ हेक्टर असून, १४९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन व त्यापाठोपाठ कापसाला बसणार आहे.

१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ३३१.८ मिमी. प्रत्यक्ष झालेला पाऊस - ४२१.१

२) पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा. हेक्टर्समध्ये)

कापूस - २,५१,१५६

सोयाबीन -२,८४,९७४

उडीद -४४,८४२

मूग -२१,२९९

तूर - ७१,९११

३) पाणीसाठा ४५ टक्क्यांवर

लघू - २८

मध्यम - ५०

मोठे - २९

४) उसनवारी कशी फेडणार?

आष्टी तालुक्यातील धानोरा मंडळात यावर्षी सर्वात कमी पाऊस नोंदला गेला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके ७५ टक्के वाया गेली आहेत. त्यामुळे नुकसान होणार असून, खरिपासाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा? -- संजय चव्हाण, शेतकरी, हिवरा, ता. आष्टी.

-------------

सोयाबीनला वेळोवेळी पाऊस राहिला तर पीक अतिशय जोमात येते; पण तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने जोमात आलेले सोयाबीन उन्हामुळे कोमेजत आहेत. उसनवारी करून शेतीसाठी खर्च केला; पण आता फेडायची कशी, याची चिंता आहे. - धोंडीराम राठोड, लवूळ, ता. माजलगाव.

-----

यंदा सोयाबीनचे पीक जोमात आहे. पावसाअभावी पिकाला धोका निर्माण झाला आहे. हलक्‍या जमिनीतील सोयाबीन सुकत आहे. काळ्या जमिनीतील सोयाबीन मात्र तग धरून आहे. --- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव.

---------