शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षेपेक्षा जादा पाऊस, पण पिके कोमात, धरणे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

बीड : तब्बल महिनाभरापासून इंद्रदेव रुसल्याने खरिपाची पिके तर काही ठिकाणी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जून ते ...

बीड : तब्बल महिनाभरापासून इंद्रदेव रुसल्याने खरिपाची पिके तर काही ठिकाणी पेरण्या संकटात सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जून ते १७ ऑगस्ट दरम्यान अपेक्षित साधारण पावसाच्या तुलनेत जादा पाऊस झाला आहे. तरीही धरणांमध्ये पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंतच आहे. तर खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे; मात्र पावसाअभावी सोयाबीनसह इतर पिकेही सुकण्याच्या परिस्थितीत आहेत. काही ठिकाणी तर पिके पिवळी पडून कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बीड खरिपाचे सर्वधारण क्षेत्र ७ लाख ४६ हजार ४८ हेक्टर असून, ७ लाख ४० हजार ७७१ हेक्टरात यंदा पेरा झाला आहे. हे प्रमाण ९९.२९ टक्के इतके आहे. जूनमध्ये दमदार हजेरी लावणारा पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गायब झाल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत. जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ३ लाख ५७ हजार ५५३ असून, ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ९० हजार ७४८ हेक्टर असून, १४९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन व त्यापाठोपाठ कापसाला बसणार आहे.

१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ३३१.८ मिमी. प्रत्यक्ष झालेला पाऊस - ४२१.१

२) पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा. हेक्टर्समध्ये)

कापूस - २,५१,१५६

सोयाबीन -२,८४,९७४

उडीद -४४,८४२

मूग -२१,२९९

तूर - ७१,९११

३) पाणीसाठा ४५ टक्क्यांवर

लघू - २८

मध्यम - ५०

मोठे - २९

४) उसनवारी कशी फेडणार?

आष्टी तालुक्यातील धानोरा मंडळात यावर्षी सर्वात कमी पाऊस नोंदला गेला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके ७५ टक्के वाया गेली आहेत. त्यामुळे नुकसान होणार असून, खरिपासाठी केलेला खर्च कसा भरून काढायचा? -- संजय चव्हाण, शेतकरी, हिवरा, ता. आष्टी.

-------------

सोयाबीनला वेळोवेळी पाऊस राहिला तर पीक अतिशय जोमात येते; पण तीन आठवड्यांपासून पाऊस नसल्याने जोमात आलेले सोयाबीन उन्हामुळे कोमेजत आहेत. उसनवारी करून शेतीसाठी खर्च केला; पण आता फेडायची कशी, याची चिंता आहे. - धोंडीराम राठोड, लवूळ, ता. माजलगाव.

-----

यंदा सोयाबीनचे पीक जोमात आहे. पावसाअभावी पिकाला धोका निर्माण झाला आहे. हलक्‍या जमिनीतील सोयाबीन सुकत आहे. काळ्या जमिनीतील सोयाबीन मात्र तग धरून आहे. --- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव.

---------