शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शिक्षकावर तलवारीने वार करून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:45 IST

घरासमोर बसलेल्या शिक्षकास साक्षीदार देण्याच्या कारणावरून तलवारीने वार केले. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या गावातील एका महिलेचा विनयभंग केला. आणखी एका रिक्षावरही दगडफेक केली. ही घटना आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी सांयकाळी घडली. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घरासमोर बसलेल्या शिक्षकास साक्षीदार देण्याच्या कारणावरून तलवारीने वार केले. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या गावातील एका महिलेचा विनयभंग केला. आणखी एका रिक्षावरही दगडफेक केली. ही घटना आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी सांयकाळी घडली. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

धामनगाव येथील शिक्षक सुभाष बाबूराव बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार चार महिन्यांपूर्वी धामणगाव येथील साहेबराव घाटविसावे यांच्या मुलाने फाशी घेतली होती. याप्रकरणी रावसाहेब लोखंडे, ऋषिकेश लोखंडे, आकाश काळे, जब्बार पठाण आणि रियाज पठाण यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद आहे. यापैकी ऋषिकेश लोखंडे याचा मित्र सुनील शिंदे हा सुभाष बोराडे यांचा भाचा आहे. त्यामुळे साहेबराव घाटविसावेची मुले विनोद आणि फिलीप उर्फ फिल्या हे सतत बोराडे यांच्याकडे भाच्याबाबतीत विचारणा करत असत आणि धमकावत असत.

रविवारी सायंकाळी ५.३० वाजता सुभाष बोराडे त्यांच्या कुटुंबियांसहित घरासमोर बोलत बसले होते. यावेळी विनोद साहेबराव घाटविसावे आणि फिलीप उर्फ फिल्या साहेबराव घाटविसावे हे दोघे भाऊ तिथे आले आणि सुनील शिंदे बद्दल विचारपूस करू लागले. त्याच्याबद्दल माहीत नसल्याचे सांगताच घाटविसावे बंधूंनी सुभाष बोराडे यांच्या मानेवर तलवारीने वार केला, परंतु बोराडेंनी तो हातावर झेलला. यावेळी भांडणे सोडविणाºया बोराडेंच्या आईलाही लाकडी दंडुक्याने मारहाण करण्यात आली.

तेवढ्यात साहेबराव घाटविसावे याने देखील तिथे येत ‘एक एकाला मारून टाका’ असे मुलांना भडकविले. यावेळी गावातील लोक येताना दिसल्याने घाटविसावे बंधू आणि पिता निघून गेले. त्यानंतर त्यांनी आणि लखन गायकवाड यांनी बाळू शंकर पवार यांना मारहाण करून त्यांच्या टेंपोच्या काचा फोडल्या आणि खिशातील ६ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर हे सर्व आरोपी तसेच ग्यानबा साळवे व संदीप जाधव यांनी अल्ताब निजाम पठाण यांच्या तीन रिक्षांच्या काचा फोडल्या आणि कुटुंबातील महिलांचा विनयभंग केला. त्यानंतर घरावर दगडफेक करत आरोपी निघून गेले. पुढे जाऊन त्यांनी इतर काही महिलांचा विनयभंग केला, असे सुभाष बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी बोराडे यांच्या तक्रारीवरून विनोद साहेबराव घाटविसावे, फिलीफ उर्फ फिल्या घाटविसावे, साहेबराव घाटविसावे, संदीप जाधव, लखन गायकवाड, गोरख घाटविसावे आणि ग्यानबा साळवे (सर्व रा., धामणगाव ता. आष्टी) या सात आरोपींवर अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक बारवकर हे करीत आहेत.