शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत शाळा सुरू करण्यासाठी मनसेचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

गेवराई : कोरोनाच्या सबबीखाली तब्बल दोन वर्षांपासून जि.प.च्या शाळा बंद आहेत. श्रीमंत लोकांचे मूल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. गोरगरिबांच्या ...

गेवराई : कोरोनाच्या सबबीखाली तब्बल दोन वर्षांपासून जि.प.च्या शाळा बंद आहेत. श्रीमंत लोकांचे मूल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. गोरगरिबांच्या मुलांना मोबाईल घेणं शक्य नसल्याने सरकारने तत्काळ जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी शनिवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षण अधिकारी कार्यालयात घंटानाद आंदोलन केले.

एकीकडे शासनाने हॉटेल, बार, मॉल, तसेच इतर सर्व आस्थापना सुरू केल्या आहेत. परंतु, शिक्षण हा मुख्य भाग असूनही ते सुरू करीत नाही. आज जरी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असले तरी हे ऑनलाईन शिक्षण मोबाईलअभावी ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येत नाही. यामुळे गरीब व श्रीमंत दरी वाढत असून, विद्यार्थी बालवयात निराशावादी होत आहेत. ही फार गंभीर बाब असून, शासनाच्या वतीने स्वतः पैसे कमाविण्याचा योजना चालू आहेत. यामध्ये गणवेश वाटप, खिचडी वाटप, पुस्तक वाटप या माध्यमातून अनेकजण पैसे कमावत आहेत. आम्ही काळजी घेतो हे भासविण्याचा प्रयत्न आहेत. मात्र, असा दिखाऊपणा बंद करून शाळा सुरू करा नाहीतर गरीब विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ब्रॉडबँड कनेक्शन, टॅब, कॉम्पुटर सर्व व्यवस्था उपलब्ध करून घ्या, अशी मागणी करीत यावेळी प्रचंड घंटानाद व घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, उपजिल्हाध्यक्ष नीलकंठ वखरे, तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, शेतकरी तालुकाध्यक्ष कृष्णा राठोड, संतोष सावंत, गणेश पवार, रवी मरकड, अशोक बेडके, विकास राऊत, विठ्ठल पट्टे, विशाल देशपांडे, सोपान राठोड, दत्ता जाधव, यदा गाडे, आदी उपस्थित होते.

040921\sakharam shinde_img-20210904-wa0018_14.jpg

गेवराईत शाळा सुरु करण्यासाठी मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.