शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

गेवराईत शाळा सुरू करण्यासाठी मनसेचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

गेवराई : कोरोनाच्या सबबीखाली तब्बल दोन वर्षांपासून जि.प.च्या शाळा बंद आहेत. श्रीमंत लोकांचे मूल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. गोरगरिबांच्या ...

गेवराई : कोरोनाच्या सबबीखाली तब्बल दोन वर्षांपासून जि.प.च्या शाळा बंद आहेत. श्रीमंत लोकांचे मूल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. गोरगरिबांच्या मुलांना मोबाईल घेणं शक्य नसल्याने सरकारने तत्काळ जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी शनिवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षण अधिकारी कार्यालयात घंटानाद आंदोलन केले.

एकीकडे शासनाने हॉटेल, बार, मॉल, तसेच इतर सर्व आस्थापना सुरू केल्या आहेत. परंतु, शिक्षण हा मुख्य भाग असूनही ते सुरू करीत नाही. आज जरी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असले तरी हे ऑनलाईन शिक्षण मोबाईलअभावी ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येत नाही. यामुळे गरीब व श्रीमंत दरी वाढत असून, विद्यार्थी बालवयात निराशावादी होत आहेत. ही फार गंभीर बाब असून, शासनाच्या वतीने स्वतः पैसे कमाविण्याचा योजना चालू आहेत. यामध्ये गणवेश वाटप, खिचडी वाटप, पुस्तक वाटप या माध्यमातून अनेकजण पैसे कमावत आहेत. आम्ही काळजी घेतो हे भासविण्याचा प्रयत्न आहेत. मात्र, असा दिखाऊपणा बंद करून शाळा सुरू करा नाहीतर गरीब विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ब्रॉडबँड कनेक्शन, टॅब, कॉम्पुटर सर्व व्यवस्था उपलब्ध करून घ्या, अशी मागणी करीत यावेळी प्रचंड घंटानाद व घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, उपजिल्हाध्यक्ष नीलकंठ वखरे, तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, शेतकरी तालुकाध्यक्ष कृष्णा राठोड, संतोष सावंत, गणेश पवार, रवी मरकड, अशोक बेडके, विकास राऊत, विठ्ठल पट्टे, विशाल देशपांडे, सोपान राठोड, दत्ता जाधव, यदा गाडे, आदी उपस्थित होते.

040921\sakharam shinde_img-20210904-wa0018_14.jpg

गेवराईत शाळा सुरु करण्यासाठी मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.