शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

५० तोळे दागिने चोरून अल्पवयीन वर्गमित्रांनी केली जीवाची मुंबई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

बीड: हायप्रोफाईल राहणीमानाचा प्रभाव, कुसंगत यामुळे शिक्षण घेण्याच्या वयात मुले भरकटण्याची शक्यता असते. कळत - नकळत हातून मोठा अपराध ...

बीड: हायप्रोफाईल राहणीमानाचा प्रभाव, कुसंगत यामुळे शिक्षण घेण्याच्या वयात मुले भरकटण्याची शक्यता असते. कळत - नकळत हातून मोठा अपराध होऊ शकतो. असाच एक प्रकार बीडमध्ये ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आला अन् पोलिसांसह नातेवाईकही चक्रावून गेले. शिक्षणासाठी मामाकडे राहायला आलेल्या भाच्याने मित्रांच्या मदतीने तब्बल ५० तोळे दागिने चोरले. त्यानंतर ते मित्रांमध्ये वाटून घेत हौसमौज करण्यासाठी थेट मुंबई गाठली. विशेष म्हणजे सातही जण अल्पवयीन असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बीड शहरातील पंचशीलनगरात एका व्यक्तीचे स्वत:चे घर आहे. त्यांचा भाजीपाला विक्रीचा पुण्यात व्यवसाय आहे. त्यामुळे ते कुटुंबासह पुण्यात राहतात. इकडे घरातील काही खोल्या किरायाने दिलेल्या असून, उर्वरित त्यांनी स्वत:च्या वापरासाठी ठेवलेल्या आहेत. त्यातील कपाटात ५० तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. त्यांचा भाचा बारावीत शिकतो. खासगी शिकवणी लावून अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्यास मामाने स्वत:च्या घरात आश्रय दिला. घरात कोणी नसल्याने समवयस्क मित्रांचे त्याच्याकडे येणे-जाणे वाढले. हौसमौज करण्यासाठी पैशांची सगळ्यांनाच चणचण भासायची. यातून घरातील ५० तोळे दागिने चोरुन मुंबई सफर करण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली. ऑगस्टअखेरीस त्यांनी दागिने चोरुन सात जणांत वाटून घेतले. १ सप्टेंबर रोजी भाच्यासह तिघे जण ट्रॅव्हल्सने पुण्याला गेले, तर इतर चौघे बीडमध्येच थांबले. पुण्याला गेलेल्या त्रिकुटाने तेथून मुंबई गाठली व परत पुण्याला येऊन लॉजमध्ये राहिले. १ ते ४ सप्टेंबरदरम्यान त्यांनी आपले शौक पूर्ण केले. एकाचवेळी तिघे गायब झाल्याने नातेवाईकांची चौकशी सुरू केली तेव्हा भाच्याने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी घरात आढळली. त्यात कोणाला किती तोळे दागिने वाटप केले, याचा तपशिल आढळला. त्यानंतर दागिने चोरीचा प्रकार समाेर आला. ४ सप्टेंबर रोजी नातेवाईकांनी पुणे गाठून तिघांचा शोध घेतला व त्यांना बीडला आणले. ५ सप्टेंबर रोजी पोलिसांनी सातही जणांची चौकशी केली. मात्र, उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

...

सुरुवातीला बेपत्ताची तक्रार नोंदविण्यास नातेवाईक आले होते. मुले अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंदविणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर तक्रार न नोंदविता नातेवाईकांनी स्वत:च मुलांना शोधून काढले. आता त्यांनी घरातून ५० तोळे दागिने चोरल्याची बाब समोर आली आहे. मात्र, अजून तक्रार नोंदविलेली नाही. त्यामुळे केवळ मुलांची प्राथमिक चौकशी केली.

- मीना तुपे, उपनिरीक्षक, शिवाजीनगर ठाणे

....

चोरीच्या दागिन्यांवर काढले लोन

यातील एकाने ६५ हजार रुपयांचा मोबाईल घेतला, तर दुसऱ्याने १४ तोळे दागिने एका खासगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून त्यावर लोन घेतले. एकाने १० तोळे दागिने अवघ्या दीड लाखांत एका सराफाला विक्री केल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

...