शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सैनिकी शाळेतील शिक्षकांचे पाच महिन्यांपासून विनावेतन प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

बीड : राज्यातील १९ जिल्ह्यातील २१ सैनिकी शाळांमधील आदिवासी तुकडीवर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या ४ ...

बीड : राज्यातील १९ जिल्ह्यातील २१ सैनिकी शाळांमधील आदिवासी तुकडीवर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाकडून निधी वितरणास दिरंगाई होत असून लवकरात लवकर आमचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे सैनिकी शाळेचे प्राचार्य डाके एस. ए. यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांच्याकडे केली आहे.

याबाबत लवकर निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यातील आदिवासी तुकडीचे शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

दरवर्षी वेतनाचा सरसकट निधी वर्षाच्या सुरुवातीलाच ६० टक्‍क्‍यांपर्यंत वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत होता, मात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये वित्त विभागाकडून दर महिन्याला केवळ ५ ते १० टक्के निधीच देण्यात येत आहे. या तुटपुंजा निधीमध्ये एक महिन्याचा पगारही अनेकदा होत नाही, अशा वेळी तो निधी परत जातो किंवा २ ते ३ महिन्यापर्यंत दुसऱ्या निधीची प्रतीक्षा करावी लागते. तेव्हा कुठे या शिक्षकांचे एक महिन्याचे वेतन निघते. अशातच तब्बल गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून सैनिकी शाळेवरील आदिवासी तुकडीवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे.

सैनिकी शाळा यांच्या आदिवासी तुकडीवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १ कोटी ९० लाख ९६ हजार रुपयांची गरज असताना केवळ २५ टक्के निधी मंजूर केला आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यातील सैनिकी शाळा मधील कर्मचाऱ्यांचे एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२१ च्या ५ महिन्यांचे पगार थकीत आहेत. पगाराविषयी या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, गृहकर्जाचे हप्ते तसेच विविध कर्जांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे दंडाचा नाहक आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. निधी मंजूर होऊनही गेल्या २५ दिवसांपासून तो वितरणाच्या अभावी शालेय शिक्षण विभागाकडे पडून आहे.

तांत्रिक अडचणी सोडवून हा निधी लवकरात लवकर वितरित करावा व कर्मचाऱ्यांच्या अनियमित वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष २२०२ एच ९७३ चे ‘प्लॅन टू नाॅन प्लॅन’ मध्ये वर्ग होणे गरजेचे असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे.

सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस. ए. यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी तुकडीवरील शिक्षकांनी बीड जि. प. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांना निवेदन देऊन आपल्या विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित या अडचणी न सुटल्यास राज्यभरातील शिक्षक राज्यभर आंदोलन करणार असल्याचे प्रत्येक जिल्ह्यातून आदिवासी तुकडी वरील शिक्षक कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठवण्यात आले आहे.