शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतर रोखता येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कामांचे स्वरूप काळानुरूप बदलले जावे, जिल्ह्यातील शेतमजूर आणि शेतकरी आदींना ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कामांचे स्वरूप काळानुरूप बदलले जावे, जिल्ह्यातील शेतमजूर आणि शेतकरी आदींना आपण गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो तरच, शहराकडे होणारे स्थलांतर रोखता येऊ शकतं या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागतील, तसेच रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजना राबवून अनुशेष भरुन काढला जाईल असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्रीजयदत्त क्षीरसागर यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा रविवारी घेताल यावेळी ते बोलत होते.जिल्ह्यातील मग्रारोहयो, कृषी, फलोत्पादनसह विविध कामांचा तपशीलवार आढावा मंत्रीजयदत्त क्षीरसागर यांनी घेतला. नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी रोहयो प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, रोहयोतून विविध प्रकारच्या कामांसाठी मान्यता दिली जाऊ शकते. शेततळे, पांदण रस्ते, सिंचन अधिक कामे यातून होऊ शकतात याचा विचार करून नियोजन व्हावे, पांदण रस्ते विकासातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागू शकतो यामुळे पांदण रस्ते निर्माण करावेत, असे क्षीरसागर यावेळी म्हणाले. याप्रसंगी शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग होण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना तसेच या कामातील प्रगती, पिक विमा योजनेचे अनुदान वाटप, सोयाबीन मधील पिक विमा नुकसान भरपाईचा रकमा, आधार करण्यातील अडचणी यांची माहिती घेऊन ही कामे वेगात पूर्ण होण्यासाठी काम करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाºयांना दिल्या, यासोबत कृषी कर्ज वाटप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन मधील कामे, सामूहिक शेततळे, फळबाग योजना, रेशीम उत्पादन आदींची माहिती घेतली.फलोत्पादनमधून आंबा उत्पादकांसाठी ‘हाय डेन्सिटी प्लांटेशन’ ही संकल्पना यशस्वी झाली असून बेळगाव येथे याची लागवड यशस्वी झाल्याचे सांगून मंत्री म्हणाले एका मीटरवर आंब्याच्या झाडांची लागवड करून अधिक उत्पादनाच्या दृष्टीने शेतक-यांना माहिती व प्रशिक्षण दिले जावे जेणेककरुन शेतीमधील उत्पादन वाढेल. यासंबंधी कृषी विभागाच्या अधिका-यांना सूचना केल्या आहेत.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिभा चाटे, तहसीलदार अविनाश शिंगटे, आर. शिनगारे, दिलीप गोरे, अरुण डाके, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, मनमोहन कलंत्री, सत्यनारायण कासट, भगीरथ बियाणी, बाळासाहेब आंबुरे आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बीड शहराशी संबंधित पाणी पुरवठ्याच्या संबंधी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आढावा घेताना शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सुचित केले.शहराला पाणीपुरवठा करणा-या बॅक वाटरचा आढावा काडीवडगाव येथे जाऊन घेतला. यावर्षी पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा आहे. पाऊस चांगला झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.नागरिकांनी देखील पाणी जपून वापरले. त्यामुळे शहराला कडक उन्हाळ््यात देखील पाणी कमी पडले नाही. तसेच पाणी जपून वापरण्याचे व वृक्ष लागवडीांदर्भात नागरिकांना आवाहन केले.दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांच्या वतीने स्वागत स्वीकारताना कोणत्याही प्रकारच्या पुष्पगुच्छ व हार-तुरे न घेण्याची भूमिका जयदत्त क्षीरसागर यांनी घेतल्याचे याप्रसंगी दिसून आले.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरgovernment schemeसरकारी योजनाcivic issueनागरी समस्याministerमंत्री