शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतर रोखता येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कामांचे स्वरूप काळानुरूप बदलले जावे, जिल्ह्यातील शेतमजूर आणि शेतकरी आदींना ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कामांचे स्वरूप काळानुरूप बदलले जावे, जिल्ह्यातील शेतमजूर आणि शेतकरी आदींना आपण गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो तरच, शहराकडे होणारे स्थलांतर रोखता येऊ शकतं या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागतील, तसेच रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजना राबवून अनुशेष भरुन काढला जाईल असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्रीजयदत्त क्षीरसागर यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा रविवारी घेताल यावेळी ते बोलत होते.जिल्ह्यातील मग्रारोहयो, कृषी, फलोत्पादनसह विविध कामांचा तपशीलवार आढावा मंत्रीजयदत्त क्षीरसागर यांनी घेतला. नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी रोहयो प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, रोहयोतून विविध प्रकारच्या कामांसाठी मान्यता दिली जाऊ शकते. शेततळे, पांदण रस्ते, सिंचन अधिक कामे यातून होऊ शकतात याचा विचार करून नियोजन व्हावे, पांदण रस्ते विकासातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागू शकतो यामुळे पांदण रस्ते निर्माण करावेत, असे क्षीरसागर यावेळी म्हणाले. याप्रसंगी शेतकरी सन्मान योजनेतील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग होण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना तसेच या कामातील प्रगती, पिक विमा योजनेचे अनुदान वाटप, सोयाबीन मधील पिक विमा नुकसान भरपाईचा रकमा, आधार करण्यातील अडचणी यांची माहिती घेऊन ही कामे वेगात पूर्ण होण्यासाठी काम करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाºयांना दिल्या, यासोबत कृषी कर्ज वाटप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन मधील कामे, सामूहिक शेततळे, फळबाग योजना, रेशीम उत्पादन आदींची माहिती घेतली.फलोत्पादनमधून आंबा उत्पादकांसाठी ‘हाय डेन्सिटी प्लांटेशन’ ही संकल्पना यशस्वी झाली असून बेळगाव येथे याची लागवड यशस्वी झाल्याचे सांगून मंत्री म्हणाले एका मीटरवर आंब्याच्या झाडांची लागवड करून अधिक उत्पादनाच्या दृष्टीने शेतक-यांना माहिती व प्रशिक्षण दिले जावे जेणेककरुन शेतीमधील उत्पादन वाढेल. यासंबंधी कृषी विभागाच्या अधिका-यांना सूचना केल्या आहेत.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतिभा चाटे, तहसीलदार अविनाश शिंगटे, आर. शिनगारे, दिलीप गोरे, अरुण डाके, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, मनमोहन कलंत्री, सत्यनारायण कासट, भगीरथ बियाणी, बाळासाहेब आंबुरे आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बीड शहराशी संबंधित पाणी पुरवठ्याच्या संबंधी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आढावा घेताना शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सुचित केले.शहराला पाणीपुरवठा करणा-या बॅक वाटरचा आढावा काडीवडगाव येथे जाऊन घेतला. यावर्षी पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा आहे. पाऊस चांगला झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.नागरिकांनी देखील पाणी जपून वापरले. त्यामुळे शहराला कडक उन्हाळ््यात देखील पाणी कमी पडले नाही. तसेच पाणी जपून वापरण्याचे व वृक्ष लागवडीांदर्भात नागरिकांना आवाहन केले.दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांच्या वतीने स्वागत स्वीकारताना कोणत्याही प्रकारच्या पुष्पगुच्छ व हार-तुरे न घेण्याची भूमिका जयदत्त क्षीरसागर यांनी घेतल्याचे याप्रसंगी दिसून आले.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरgovernment schemeसरकारी योजनाcivic issueनागरी समस्याministerमंत्री