शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

मासिक पाळीत स्वच्छता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

बीड : मासिक पाळीतील स्वच्छतेअभावी होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. ...

बीड : मासिक पाळीतील स्वच्छतेअभावी होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. माधुरी रायमाने यांनी केले. येथील माऊली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालयात गृहविज्ञान विभाग, समाजशास्त्र विभाग, महिला विकास कक्ष आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेच्या वतीने जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त राज्यस्तरीय वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सविता शेटे या होत्या.

सुरुवातीला प्राचार्य डॉ. शेटे यांनी युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार ७० टक्के मुली मासिक पाळी सुरू असताना शाळेत जात नाहीत, तर ८४ टक्के मुलींच्या शाळेत मासिक पाळीत आवश्यक साधनांची सुविधा नसल्याची माहिती दिली. मासिक पाळीतील स्वच्छतेसाठी देखील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर कशी गुंतवणूक झाली पाहिजे यावर मत मांडले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. माधुरी रायमाने यांनी ‘मासिक पाळी-स्वच्छता आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. मासिक पाळीत स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी सविस्तर आणि सोदाहरण पटवून दिले. आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जंतुसंसर्ग टाळण्यासाठी सजग राहण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनानंतर उपस्थितांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या मनातील शंकाचे निरसन करून घेतले. सूत्रसंचालन करून पाहुण्यांचा परिचय गृहविज्ञान विभागाच्या डॉ. संध्या आयस्कर यांनी करून दिला. महिला विकास कक्षाच्या डॉ. अर्चना वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक, विद्यार्थी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांमधील व्यक्ती, गृहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.