शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरबूज, टरबुजाला मागणी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST

खाजगी वाहनांमध्ये मर्यादित प्रवासी अंबाजोगाई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्बंधात वाहतुकीला सूट देण्यात आलेली ...

खाजगी वाहनांमध्ये मर्यादित प्रवासी

अंबाजोगाई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्बंधात वाहतुकीला सूट देण्यात आलेली आहे. मात्र, त्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. याचे पालन खाजगी प्रवासी वाहतूकदार करीत आहेत. खाजगी टॅक्सीमध्ये केवळ चार प्रवासी बसविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही सुरक्षिततेची हमी मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

मंगल कार्यालये, लॉन बंदच

अंबाजोगाई : लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका मंगल कार्यालये, लॉन व मंगल सेवावाल्यांना बसला आहे. तसेच या व्यवसायाशी संलग्न असणारे अनेक व्यावसायिक आहेत. ऐन लग्नसराईच्या वेळी व्यवसाय बंद झाल्याने हजारो कुटुंबांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. यामुळे परवानगी नसलेली मंगल कार्यालये, लॉन व मंगल सेवावाल्यांना त्यांचे व्यवसाय नियमांनुसार सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मंगलसेवा व्यावसायिक सुनील जाधव यांनी केली आहे.

वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवा

अंबाजोगाई : तालुक्यात सध्या विजेच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. मांजरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या वीज उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात यावी. तरच शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होईल, अन्यथा पाण्याची उपलब्धता असूनही पिकांना पाणी मिळणार नाही. यासाठी क्षमता वाढवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.

कृषी माल वितरण व्यवस्था उभारावी

अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे एका बाजूला शेतमाल विक्रीचे आव्हान तर दुसऱ्या बाजूला कमी झालेले दर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या या अडचणींचा विचार करून कृषी माल वितरण व्यवस्था उभारणीसाठी शासनस्तरावर योग्य विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ख्वाजामियाँ पठाण यांनी केली आहे.