शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चावडीवरील बैठका झाल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST

लसीकरण करून घ्या अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. मध्यंतरी दोन दिवस लसीचा ...

लसीकरण करून घ्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. मध्यंतरी दोन दिवस लसीचा स्टॉक कमी झाल्याने लसीकरण मोहीम मंदावली होती. मात्र, आता पुन्हा लस साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ४५ वर्षे वयाच्या पुढील महिला व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी केले आहे.

लोखंडीच्या कोविड रुग्णालयात रेंजअभावी गैरसोय

अंबाजोगाई : लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. या परिसरात मोबाइलला रेंज उपलब्ध होत नाही. कोरोनाबाधित रुग्णांना धीर देण्यासाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळी सातत्याने फोन करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रेंज उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे नातेवाइकांना संपर्क साधणे मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. रुग्णही रेंज उपलब्ध व्हावी म्हणून आपला बेड सोडून खिडक्या गाठून रेंज उपलब्ध होते का? यासाठी धडपडत असतात. रुग्णांना दिलासा देण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी या परिसरात रेंज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र जाधव यांनी केली आहे.

नातेवाइकांची धावपळ

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नातेवाइकांचीही धावपळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, त्यांच्या विविध तपासण्यांचे रिपोर्ट आणणे, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नातेवाइकांना तपासणीसाठी नेणे, अशा विविध कामांसाठी अंबाजोगाई तालुक्यात सध्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे.

लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत घ्यावा

अंबाजोगाई : लाँड्री व्यवसाय हा दैनंदिन जीवनात गरजेचा व्यवसाय बनलेला आहे. कपडे धुणे, त्यांना इस्त्री करणे हे काम स्वच्छतेचे आहे. यासाठी लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा, लाँड्री व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे. हे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व सेवाभाव जोपासण्यासाठी लाँड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल जाधव यांनी केली आहे.