शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

माजलगावात लॉकडाऊनची दोन तासांची सूट व्यापाऱ्यांनी धुडकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय लागू केला आहे. यात जिल्ह्यात किराणा दुकानदारांना दोन तासांची सूट देण्यात आली. हा निर्णय ...

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय लागू केला आहे. यात जिल्ह्यात किराणा दुकानदारांना दोन तासांची सूट देण्यात आली. हा निर्णय मनमानी असून, व्यापाऱ्यांना आर्थिक खाईत लोटणारा आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे यापूर्वी अतोनात नुकसान झाले आहे. ८० टक्के दुकानदार हे किरायाने दुकाने घेऊन व्यवसाय करतात. अशा दुकानदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना विचारात न घेता हा निर्णय लागू करून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न असल्याच्या भावना माजलगावात व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी माजलगावात किराणा व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापार करण्यासाठी दिलेली दोन तासांची मुदत धुडकावून लावत आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. येथील आ. प्रकाश सोळंके हे व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, असे व्यापाऱ्यांना वाटत होते; परंतु आ. सोळंके यांनी व्यापाऱ्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, शुक्रवारपासून लॉकडाऊन असताना पोलिसांच्या कमतरतेमुळे शहरातून नागरिकांचा मुक्तपणे संचार सुरू होता. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात येत असताना त्यांना कोणीच हटकत नव्हते. दुपारपर्यंत पोलीस २-३ चौकात केवळ होमगार्ड आढळून आले. त्यानंतर अनेक चौकांत ते आढळून आले नाहीत. यामुळे नागरिकांचा वावर सुरूच होता. प्रशासनाने कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून लॉकडाऊन केले. मात्र, नागरिकांच्या मुक्त संचारामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

===Photopath===

260321\img_20210326_122320_14.jpg

===Caption===

माजलगावात लॉकडाऊनची दोन तासाची सुट व्यापाऱ्यांनी धुडकावली. दुकाने बंद ठेवली.