शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव जलविद्युत केंद्राला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:19 IST

माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली. परंतु पुढील दोन-तीन वर्ष कार्यान्वित राहिल्यानंतर मागील सात ते आठ वर्षांपासून हा जलविद्युत केंद्र केवळ यंत्र समुग्रीची योग्य देखभाल न केल्यामुळे बंद आहे.धरणातून उजव्या कालव्याद्वारे किमान ५ ते ६ पाणीपाळ्या शेतकºयांना सिंचनासाठी दरवर्षी दिल्या जातात. तसेच परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला देखील आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते. वाहून जाणाºया या पाण्याचा वापर व्हावा,या हेतूने येथे जलविद्युत केंद्राची उभारणी झाली. या ठिकाणी ७५० के.व्ही. क्षमतेचे तीन संच आहेत. पैकी संच क्र. १ हा पहिल्याच वर्षी निकामी झाला तर संच क्र.२ चे द्रवचलित उच्चलक हे निकामी झाले. त्यामुळे संच ३ मध्ये बिघाड झाल्यानंतर त्याचे साहित्य वापरल्यामुळे संच २ देखील बंद पडला. २०११ मध्ये येथील चालू असलेल्या एकमेव संचावरच वीज निर्मिती केवळ नावापुरतीच झाली. त्या नंतर मात्र २०११ पासून संपूर्ण जलविद्युत केंद्रच बंद पडलेले आहे.येथील यंत्र सामुग्रीची अवस्था भंगारात घालण्याजोगी झाली असून, आता कितीही खर्च केला तरी जलविद्युत केंद्र कार्यान्वित होईल अथवा नाही या बाबत शंकाच आहे.येथील सुरक्षा वाºयावर असून, रात्री तर सोडाच; दिवसादेखील या ठिकाणी वॉचमन अथवा कर्मचारी नसतो तरीही येथील सुरक्षेच्या नावावर खर्च केला जात असल्याची माहिती समोर आहे. अधिकाºयांनी भ्रष्टाचार चालविल्याच्या तक्रारी आहेत.तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटावा म्हणून जलसंपदा खात्याने २५ वर्षापूर्वी या वीजनिर्मिती प्रकल्पावर करोडो खर्च करत धरणावर प्रकल्प उभा केला. तेवढा खर्च देखील निघाला नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे ७-८ वर्षात एक युनिटही वीज तयार झाली नाही.गोदावरी जलविद्युत, उपसा सिंचन विभागाचे येथील शाखा अभियंता नितीन जोगळेकर यांच्याशी संपर्क केला असता, ‘मला काहीही माहिती सांगता येणार नाही, तुम्ही औरंगाबादला या’ म्हणत टाळाटाळ केली. तर कार्यकारी अभियंता डी.एस. तडवी यांनी देखील असेच उत्तर देऊन येथे चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत कानावर हात ठेवला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBeedबीड