शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

माजलगाव आगाराची सात शहरांवर मदार , दररोज दोन लाखांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:02 IST

पुरूषोत्तम करवा माजलगाव : येथील आगारातुन ग्रामीण भागातील फे-या कमी झाल्या असल्यातरी शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ ...

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : येथील आगारातुन ग्रामीण भागातील फे-या कमी झाल्या असल्यातरी शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ झाली असलीतरी केवळ सात शहरांवर आगाराची मदार असुन ग्रामीण भागातील बसमध्ये केवळ विद्यार्थीच प्रवास करत आहेत. त्यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रूपये तोटयात चालले आहे.

माजलगाव आगाराचे कोरोनापुर्वी उत्पन्न चांगले होते. लॉकडाऊननंतर या आगारातू केवळ शहरी भागात बस सुरू करण्यात आल्या.सुरूवातीला या बस सुध्दा रिकाम्या धावत होत्या त्यानंतर थोड्या फार प्रमाणात प्रवाशी वाढु लागले.या आगारातुन मोठ्या प्रमाणावर लांब पल्याच्या बस सुरू असुन यात कोल्हापुर , नांदेड ,मुंबई ,लातुर ,सोलापुर ,मेहकर व बुलढाणा या सात ठिकाणी जाणाऱ्या बसचे उत्पन्न आगाराच्या ६५-७० टक्के ऐवढे आहे. यामुळे या आगाराची वरील सात गावांवर मदार असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. येथुन जाणाऱ्या बस पुर्वी २० हजार कि.मी.चालत असत. परंतु आता केवळ १७ हजार कि.मी.महिन्याला चालु आहेत.

या आगाराचा सध्या दररोजचा खर्च ६ लाख ५० हजार रूपये होत असून उत्पन्न केवळ ४ लाख ५० हजार मिळत असुन या उत्पन्नापैकी ३ लाख रुपये उत्पन्न वरील सात शहरांवर मिळते. यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रूपयांनी तोटयात चालले आहे.सध्या या आगारातुन चालणाऱ्या निमआराम ,शिवशाही , स्लीपर कोच या बस मोठ्या प्रमाणावर तोटयात दिसून येत आहेत तर रातराणी बस फायदयात चालत असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.

माजलगाव आगारातून जवळपास ९० टक्के ग्रामीण भागात बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी या बसकडे प्रवाशी पाठ फिरवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या बस मध्ये केवळ विदयार्थीच येत आहेत. सध्या या आगारातून एक हजार विद्यार्थ्यांना पास वाटप करण्यात आल्या असल्यातरी आनखी तीन हजार विद्यार्थी पासपासून दुर आहेत.

या आगारातुन केवळ लातुरला प्रत्येक तासाला बस जात आहेत. सकाळी सहा वाजल्यांपासुन दोन वाजेपर्यंत प्रत्येक तासाला लातुरला जाण्यासाठी बस उपलब्ध असून येण्यासाठी १० वाजेपासुन ५ वाजेपर्यंत बस सुरू आहेत.लातुरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी जास्त फे-या चालु असल्याची माहिती आगार प्रमुख दत्तात्रय काळमपाटील यांनी दिली.