शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

माजलगाव आगाराची सात शहरांवर मदार , दररोज दोन लाखांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:02 IST

पुरूषोत्तम करवा माजलगाव : येथील आगारातुन ग्रामीण भागातील फे-या कमी झाल्या असल्यातरी शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ ...

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : येथील आगारातुन ग्रामीण भागातील फे-या कमी झाल्या असल्यातरी शहरी भागातील चालणाऱ्या बसमुळे उत्पन्नात वाढ झाली असलीतरी केवळ सात शहरांवर आगाराची मदार असुन ग्रामीण भागातील बसमध्ये केवळ विद्यार्थीच प्रवास करत आहेत. त्यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रूपये तोटयात चालले आहे.

माजलगाव आगाराचे कोरोनापुर्वी उत्पन्न चांगले होते. लॉकडाऊननंतर या आगारातू केवळ शहरी भागात बस सुरू करण्यात आल्या.सुरूवातीला या बस सुध्दा रिकाम्या धावत होत्या त्यानंतर थोड्या फार प्रमाणात प्रवाशी वाढु लागले.या आगारातुन मोठ्या प्रमाणावर लांब पल्याच्या बस सुरू असुन यात कोल्हापुर , नांदेड ,मुंबई ,लातुर ,सोलापुर ,मेहकर व बुलढाणा या सात ठिकाणी जाणाऱ्या बसचे उत्पन्न आगाराच्या ६५-७० टक्के ऐवढे आहे. यामुळे या आगाराची वरील सात गावांवर मदार असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. येथुन जाणाऱ्या बस पुर्वी २० हजार कि.मी.चालत असत. परंतु आता केवळ १७ हजार कि.मी.महिन्याला चालु आहेत.

या आगाराचा सध्या दररोजचा खर्च ६ लाख ५० हजार रूपये होत असून उत्पन्न केवळ ४ लाख ५० हजार मिळत असुन या उत्पन्नापैकी ३ लाख रुपये उत्पन्न वरील सात शहरांवर मिळते. यामुळे सध्या हे आगार दररोज दोन लाख रूपयांनी तोटयात चालले आहे.सध्या या आगारातुन चालणाऱ्या निमआराम ,शिवशाही , स्लीपर कोच या बस मोठ्या प्रमाणावर तोटयात दिसून येत आहेत तर रातराणी बस फायदयात चालत असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली.

माजलगाव आगारातून जवळपास ९० टक्के ग्रामीण भागात बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी या बसकडे प्रवाशी पाठ फिरवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या बस मध्ये केवळ विदयार्थीच येत आहेत. सध्या या आगारातून एक हजार विद्यार्थ्यांना पास वाटप करण्यात आल्या असल्यातरी आनखी तीन हजार विद्यार्थी पासपासून दुर आहेत.

या आगारातुन केवळ लातुरला प्रत्येक तासाला बस जात आहेत. सकाळी सहा वाजल्यांपासुन दोन वाजेपर्यंत प्रत्येक तासाला लातुरला जाण्यासाठी बस उपलब्ध असून येण्यासाठी १० वाजेपासुन ५ वाजेपर्यंत बस सुरू आहेत.लातुरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी जास्त फे-या चालु असल्याची माहिती आगार प्रमुख दत्तात्रय काळमपाटील यांनी दिली.